शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
कतरने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
3
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
4
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
5
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
6
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
7
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
8
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
9
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
10
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
11
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
12
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
13
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
14
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
15
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
16
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
17
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
18
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
19
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
20
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी

जलसंधारण विभागाने फुलवले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:59 IST

दुष्काळावर मात करण्यासाठी जालना येथील मृद व जलसंधारण विभागाने कार्यालय परिसरात विविध जातीचे तब्बल ३७०० रोपे लावून नंदनवन फुलवले आहे

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळावर मात करण्यासाठी जालना येथील मृद व जलसंधारण विभागाने कार्यालय परिसरात विविध जातीचे तब्बल ३७०० रोपे लावून नंदनवन फुलवले आहे. या नंदनवनामुळे एरव्ही ओसडा असलेला हा विभाग आता सर्वांनाच आकर्षित करीत आहे.मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस झाडांचे प्रमाणही कमी होत असल्याने पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास होत आहे. परिणामी, दरवर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होत आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र पाणीटंचाई भासत असून, पाण्याच्या शोधासाठी प्रत्येकाला वणवण भटकंती करावी लागत आहे, असे असताना जिल्ह्यात मात्र सर्रासपणे वृक्षतोड सुरु आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.एकीकडे प्रशासनाकडूनच कारवाई केली जात नाही तर दुसरीकडे प्रशासनाचेच अधिकारी वृक्ष लागवडीवर भर देत आहेत. सध्या जालना शहरातील शासकीय रूग्णालयाच्या रस्त्यावर असलेल्या मृद व जलसंधारण विभागाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी गिरवरसिंग सुसमणी यांच्या संकल्पनेतून कार्यालय परिसरातील ६६६ चौरस मीटरवर ‘मिया वाकी डेन्स फॉरेस्ट’ उभारण्यात आले आहे. यात विविध जातीच्या २१०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. तर अडीच हेक्टरवर १६०० रोपांची लागवड करून नंदनवन फुलविण्यात आले आहे.पावसाळ््यात या झाडांची लागवड करण्यात आली. खडकाळ जमीन असल्यामुळे येथे मोतीबाग येथून ७० टिपर गाळ आणून टाकण्यात आला. त्यात ही झाडे लावण्यात आली आहे. यासाठी जलसंधारण अधिकारी सुसमणी व कार्यालयीन अधीक्षक के. एस. जावळे यांनी परिश्रम घेतले.पाण्यासाठी हौद ; झाडांना ठिंबकचा आधारलागवड केलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी १३ हजार लिटर साठवण समता असलेला हौद तयार करण्यात आला आहे. तसेच बोअर देखील घेण्यात आला आहे. पाण्याचा अपव्यय टाळावा, यासाठी सर्वच झाडांना ठिंबक सिंचन करण्यात आले आहे. झाडांना मोकाट जनावरांनी खाऊ नये, यासाठी वाल कम्पाऊंड देखील करण्यात आले. झाडांच्या निगराणीसाठी एक व्यक्ती ठेवण्यात आला आहे.या जातींच्या रोपांची केली लागवडया परिसरात पिंपळ, लिंबू, रबर ट्री, गुलमोहर, बांबू, शेवगा, फणस, सिरस, बदाम, जास्वंद, चमेली, सिसम, पपई, एकझोरा, आवळा, कांचन, बूच, शेवरी, सागरगोटा, रेन ट्री, ग्रीसडिया, आंबा, करंज, रूठी, गोरखचिंच, शेमल, बोर, अंजन इ. जातींच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणNatureनिसर्गGovernmentसरकार