शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

राजूर परिसरातील दोन प्रकल्पांना संरक्षणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:25 IST

राजूरसह परिसरातील पंधरा गावांची तहान भागविणाऱ्या बाणेगाव आणि चांधई एक्को मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र, अज्ञात व्यक्तींकडून वारंवार खोडसाळपणा करून प्रकल्पाचे गेट उघडण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : राजूरसह परिसरातील पंधरा गावांची तहान भागविणाऱ्या बाणेगाव आणि चांधई एक्को मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र, अज्ञात व्यक्तींकडून वारंवार खोडसाळपणा करून प्रकल्पाचे गेट उघडण्यात येत आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याने दोन्ही प्रकल्पांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांधून होत आहे.भोकरदन तालुक्यातील बाणेगाव आणि चांधई एक्को मध्यम प्रकल्पातून राजूरसह पंचक्रोशितील पंधरा गावांची तहान भागवली जाते. दोन्ही प्रकल्पाच्या परिसरातील शेतकरी बुडीत क्षेत्रात खरीप पिकांची लागवड करतात. प्रकल्प पाण्याने तुडूंब भरण्याची स्थिती निर्माण झाल्यानंतर पिकाला अडचण निर्माण होवू नये, म्हणून काही अज्ञात व्यक्ती खोडसाळपणा करून प्रकल्पातील पाण्याला वाट मोकळी करून देतात. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. गेल्या तीन वर्षांपासून चांधई एक्को मध्यम प्रकल्प तुडूंब भरल्यानंतर अज्ञात व्यक्तीने प्रकल्पाच्या मध्यभागी छिद्र पाडून पाण्याला वाट मोकळी करून दिली होती.लघूपाटबंधारे विभागाचे प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असल्याने माथेफिरूंचे फावत आहे. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. दोन्ही प्रकल्पात जलसाठा न झाल्यास परिसरातील पंधरा गावातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागू शकते, यावर्षी पावसाळ््यात एकही पाऊस न झाल्याने दोन्ही प्रकल्प कोरडेठाक होते. मात्र, परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.२९ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री बाणेगाव मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे साखळी, कुलूप तोडून दरवाजे खुले करण्यात आले होते. यामुळे रात्रभर लाखो लिटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे अज्ञाताने साखळी कुलूप घेऊन पोबारा केलेला आहे.महसूल विभागाने बुधवारी दरवाजा बसविला. मात्र, संबंधित विभागाने यावर कोणतीच ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे अज्ञात लोकांचे फावत असल्याचा सूर नागरिकांमधून निघत आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी