शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

Jalana: ओल्या दुष्काळासाठी अंबडमध्ये शेतकऱ्यांचा 'बोंब मारो मोर्चा', सरकारवर उगारला चाबूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:14 IST

अतिवृष्टीने पिकं खराब झाली, शेतकऱ्यांनी मोर्चात आणली; अंबडमध्ये मागण्यांसाठी जोरदार आंदोलन

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासह इतर 20 मागण्यांसाठी अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर बोंब मारो मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पीक सोबत घेऊन अंबड तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले. अंबड शहरातील मत्स्योदरी देवी मंदिरापासून या मोर्चाची सुरुवात होऊन अंबड तहसील कार्यालयावरती धडकला. 

यावेळी सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी जागे व्हा, असे म्हणत शेतकऱ्यांनी हातात चाबूक घेऊन तो जमिनीवर फटकारला. शेतकऱ्यांनी सोबत अतिवृष्टीने नुकसान झालेले सोयाबीन कापूस तूर व मोसंबी घेऊन सहभागी झाले होते. यावेळी सरकारला जागे करण्यासाठी बोंब मारत, 'जाहीर करा जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकरी एक जुटीचा विजय असो, जय जवान, जय किसान' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी तहसीलदार विजय चव्हाण यांनी शेतकऱ्याच्या वतीने देण्यात आलेले निवेदन स्वीकारले.

अंबड तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे, शेतकऱ्यांना तोकडी रक्कम देऊ नका, पर्जन्यमापक यंत्र प्रत्येक मंडळात अद्यावत बसवा, पिक विमा व अनुदान याला क्षेत्र अटी शर्ती करू नये अशाही मागण्या करण्यात आल्या.

या आहेत शेतकऱ्याच्या मागण्या: - अंबड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा.- शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करा, - कुठलाही निकष न लावता शेतकऱ्यांच्या मुलांची सरसकट शैक्षणिक फी माफ करा. - सन 2018 मंजूर असलेला खरीप पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना वाटप करा.- ई-पिक पाहणी करण्यास शेतकर्यांना अडचणी येत असून पिक पाहणी ऑफलाईन करण्यात यावी.- फार्मर आईडी प्रलंबित प्रकरणे निकाली काढा. - नदी व नाल्याजवळील व पाणलोट क्षेत्राखालील माती खरडवून गेलेल्या जमीन मालकांना नैसर्गिक आपत्ती पुनर्वसन कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी.- पीएम किसान योजनेतील प्रकरणे तत्काळ निकाली काढावी- पीएम किसान शेतकरी नोंदणी पोर्टल सुरु करावे.- पिक विमा कंपनीचे तालुका स्तरावर कायमस्वरूपी कार्यालय सुरु करावे,- शेतात राहणाऱ्या शेतकर्याना रात्रीची लाईट कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावी,- अतिवृष्टी मुळे चारा नुकसान झाल्याने पशु पालकांना चार्यासाठी अतिरिक्त आर्थिक मदत करावी.- पिक नुकसान भरपाईसाठी क्षेत्र मर्यादा न ठेवता सरसकट भूधारकांना नुकसान भरपाई मदत करावी.- NDRF च्या नियमात प्रती हेक्टरी 5000 हजार रुपयांची वाढ करावी- नुकसान भरपाईसाठी कोरडवाहू, बागायती, फळबागायती अनुदांची अंमलबजावणी करावी.- थकीत कर्जदार शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा पिकविमा व अनुदान रक्कम शेतकर्यांना देण्यात यावी- पंचनामे झाल्यावर अनुदानाची रक्कम शेतकर्यांना 30 दिवसात वाटप करावी- रासायनिक खतासोबत इतर खतांची लिंकिंग करणाऱ्या वितरकावर कार्यवाही करावी.- रब्बीच्या पेरणीसाठी खत व बियाणे मोफत पुरवावे.- सन २०२४ अतिवृष्टी अनुदान पात्र शेतकर्याचे राहिलेले VK नं. देण्यात यावा

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस