शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

Jalana: ओल्या दुष्काळासाठी अंबडमध्ये शेतकऱ्यांचा 'बोंब मारो मोर्चा', सरकारवर उगारला चाबूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:14 IST

अतिवृष्टीने पिकं खराब झाली, शेतकऱ्यांनी मोर्चात आणली; अंबडमध्ये मागण्यांसाठी जोरदार आंदोलन

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासह इतर 20 मागण्यांसाठी अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर बोंब मारो मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पीक सोबत घेऊन अंबड तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले. अंबड शहरातील मत्स्योदरी देवी मंदिरापासून या मोर्चाची सुरुवात होऊन अंबड तहसील कार्यालयावरती धडकला. 

यावेळी सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी जागे व्हा, असे म्हणत शेतकऱ्यांनी हातात चाबूक घेऊन तो जमिनीवर फटकारला. शेतकऱ्यांनी सोबत अतिवृष्टीने नुकसान झालेले सोयाबीन कापूस तूर व मोसंबी घेऊन सहभागी झाले होते. यावेळी सरकारला जागे करण्यासाठी बोंब मारत, 'जाहीर करा जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकरी एक जुटीचा विजय असो, जय जवान, जय किसान' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी तहसीलदार विजय चव्हाण यांनी शेतकऱ्याच्या वतीने देण्यात आलेले निवेदन स्वीकारले.

अंबड तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे, शेतकऱ्यांना तोकडी रक्कम देऊ नका, पर्जन्यमापक यंत्र प्रत्येक मंडळात अद्यावत बसवा, पिक विमा व अनुदान याला क्षेत्र अटी शर्ती करू नये अशाही मागण्या करण्यात आल्या.

या आहेत शेतकऱ्याच्या मागण्या: - अंबड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा.- शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करा, - कुठलाही निकष न लावता शेतकऱ्यांच्या मुलांची सरसकट शैक्षणिक फी माफ करा. - सन 2018 मंजूर असलेला खरीप पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना वाटप करा.- ई-पिक पाहणी करण्यास शेतकर्यांना अडचणी येत असून पिक पाहणी ऑफलाईन करण्यात यावी.- फार्मर आईडी प्रलंबित प्रकरणे निकाली काढा. - नदी व नाल्याजवळील व पाणलोट क्षेत्राखालील माती खरडवून गेलेल्या जमीन मालकांना नैसर्गिक आपत्ती पुनर्वसन कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी.- पीएम किसान योजनेतील प्रकरणे तत्काळ निकाली काढावी- पीएम किसान शेतकरी नोंदणी पोर्टल सुरु करावे.- पिक विमा कंपनीचे तालुका स्तरावर कायमस्वरूपी कार्यालय सुरु करावे,- शेतात राहणाऱ्या शेतकर्याना रात्रीची लाईट कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावी,- अतिवृष्टी मुळे चारा नुकसान झाल्याने पशु पालकांना चार्यासाठी अतिरिक्त आर्थिक मदत करावी.- पिक नुकसान भरपाईसाठी क्षेत्र मर्यादा न ठेवता सरसकट भूधारकांना नुकसान भरपाई मदत करावी.- NDRF च्या नियमात प्रती हेक्टरी 5000 हजार रुपयांची वाढ करावी- नुकसान भरपाईसाठी कोरडवाहू, बागायती, फळबागायती अनुदांची अंमलबजावणी करावी.- थकीत कर्जदार शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा पिकविमा व अनुदान रक्कम शेतकर्यांना देण्यात यावी- पंचनामे झाल्यावर अनुदानाची रक्कम शेतकर्यांना 30 दिवसात वाटप करावी- रासायनिक खतासोबत इतर खतांची लिंकिंग करणाऱ्या वितरकावर कार्यवाही करावी.- रब्बीच्या पेरणीसाठी खत व बियाणे मोफत पुरवावे.- सन २०२४ अतिवृष्टी अनुदान पात्र शेतकर्याचे राहिलेले VK नं. देण्यात यावा

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस