शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

विष घेतलेल्या पतीचा मृत्यू; पत्नी चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:51 IST

एका दाम्पत्याने शनिवारी सायंकाळी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले. पतीचा जागीच मृत्यू असून, त्याच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन शहरातील पोस्ट आॅफिस भागात राहणाऱ्या एका दाम्पत्याने शनिवारी सायंकाळी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले. या घटनेत पतीचा जागीच मृत्यू असून, त्याच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे. संबंधित महिलेला उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.भगवान पुंजाजी मोरे (५५) असे मयताचे नाव आहे. भोकरदन तालुक्यातील नांजा येथील भगवान मोरे हे भोकरदन शहरातील एका शेतक-याकडे सालगडी म्हणून कामाला होते. शहरातील पोस्ट कार्यालयाच्या बाजूला किरायाने घेतलेल्या एका खोलीत पत्नी लक्ष्मीबाई (४५) यांच्या समवेत ते राहत होते. शनिवारी शहरातील आठवडी बाजार असल्याने भगवान मोरे हे बाजारात गेले होते. ते घरी परतल्यानंतर पत्नी लक्ष्मीबाई यांच्यासमवेत शाब्दिक बाचाबाची झाली. काही काळानंतर त्यांच्यातील भांडण थांबले. मात्र, बराच वेळ झाला तरी घरातून आवाज येत नसल्याने त्यांच्या घराशेजारी राहणा-या एकाने दरवाजा उघडला. त्यावेळी मोरे दाम्पत्य एकमेकांजवळ शांत बसलेले दिसून आले. मात्र, परिस्थिती वेगळीच असल्याचा संशय आल्याने त्या युवकाने इतरांना बोलावून घेतले. नागरिकांनी पाहणी केली असता भगवान मोरे हे मयत झाल्याचे दिसून आले. तर लक्ष्मीबाई या बेशुध्द अवस्थेत दिसून आल्या. नागरिकांनी तात्काळ त्यांना खासगी रिक्षातून ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉ. एस. एस. म्हेत्रे यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबादकडे पाठवून दिले.घटनेची माहिती मिळताच बीट जमादार डी.जे. शिंदे, बी.एल.राठोड यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, त्या दाम्पत्याने विष कोणत्या कारणाने घेतले, हे उशिरापर्यंत समजू शकले नाही. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पार्थिव ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले.या दाम्पत्यास एक मुलगा, तीन मुली आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार