शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सावळ्याच्या दर्शनापूर्वीच घेतला विसावा; २५ वर्षांपासून वारी करणाऱ्या वारकऱ्याचे दिंडीतच निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:02 IST

पंढरपूरपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असताना वाटेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले निधन

टेंभुर्णी (जि. जालना) : जाफराबाद तालुक्यातील बुटखेडा येथील रतन श्रीराम नागवे (वय ५२) या वारकऱ्याचे दिंडीतच निधन झाले. सावळ्याच्या दर्शनापूर्वीच या वारकऱ्याने शेवटचा विसावा घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रतन नागवे हे मागील २५ वर्षांपासून पंढरीची पायी वारी करायचे. ते दरवर्षी तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत देहू ते पंढरपूर दिंडीत सहभागी होत असत. यावर्षीही गावातील चार वारकऱ्यांसह रतन नागवे हे तुकाराम महाराजांच्या दिंडीत ‘विठ्ठल विठ्ठल’च्या गजरात पंढरपूरकडे निघाले होते. मात्र, पंढरपूरपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असताना वाटेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे अकलूज येथे १ जुलैला निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुटखेडा येथे बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

संघर्षातून उभे केले कुटुंबमयत वारकरी रतन श्रीराम नागवे हे मूळचे भोकरदन तालुक्यातील खामखेडा येथील रहिवासी होत. त्यांचे वडील कित्येक वर्षांपूर्वी बुटखेडा येथे आल्याने ते येथेच स्थायिक झाले होते. अतिशय संघर्षातून रतन नागवे यांनी आपल्या परिवाराला उभे केले. स्वकष्टावर त्यांनी बुटखेडा येथे शेती घेऊन आपली कौटुंबिक स्थिती सुधारली होती. त्यांच्या पश्चात येथील देवीच्या मंदिरात पुजारी असलेल्या आई, पत्नी, दोन मुले, एक भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Jalanaजालनाashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025