शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
2
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
3
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
4
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
5
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
8
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
9
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
10
ना भिंतीवर पोस्टर, ना रॅली, ना फ्लेक्सबाजी; जपानची निवडणूक पद्धत पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
11
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
12
इराणवरील लष्करी कारवाईला तूर्तास ब्रेक; अमेरिकेनं दिली चर्चेची आणखी एक ऑफर, तोडगा निघणार?
13
"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
14
Uday Samant: 'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
15
दुपारी जेवणानंतर का येते झोप? सायंटिफीक कारण समजल्यावर तुम्हीही नक्कीच घ्याल 'पॉवर नॅप'
16
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
17
IND vs NZ: विराट-शिखरचा विक्रम धोक्यात! श्रेयस अय्यर वनडे क्रिकेटमध्ये रचणार 'असा' इतिहास
18
२०००% नं वधारला हा स्मॉलकॅप शेअर, ₹54 वर आलाय भाव; आता कंपनी ₹84 कोटींचे भांडवल उभारणार
19
तुमच्या कुटुंबाचे भविष्य करा सुरक्षित! वर्षाला फक्त २० रुपये भरा आणि मिळवा २ लाखांचे कवच
20
मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...
Daily Top 2Weekly Top 5

सावळ्याच्या दर्शनापूर्वीच घेतला विसावा; २५ वर्षांपासून वारी करणाऱ्या वारकऱ्याचे दिंडीतच निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:02 IST

पंढरपूरपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असताना वाटेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले निधन

टेंभुर्णी (जि. जालना) : जाफराबाद तालुक्यातील बुटखेडा येथील रतन श्रीराम नागवे (वय ५२) या वारकऱ्याचे दिंडीतच निधन झाले. सावळ्याच्या दर्शनापूर्वीच या वारकऱ्याने शेवटचा विसावा घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रतन नागवे हे मागील २५ वर्षांपासून पंढरीची पायी वारी करायचे. ते दरवर्षी तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत देहू ते पंढरपूर दिंडीत सहभागी होत असत. यावर्षीही गावातील चार वारकऱ्यांसह रतन नागवे हे तुकाराम महाराजांच्या दिंडीत ‘विठ्ठल विठ्ठल’च्या गजरात पंढरपूरकडे निघाले होते. मात्र, पंढरपूरपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असताना वाटेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे अकलूज येथे १ जुलैला निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुटखेडा येथे बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

संघर्षातून उभे केले कुटुंबमयत वारकरी रतन श्रीराम नागवे हे मूळचे भोकरदन तालुक्यातील खामखेडा येथील रहिवासी होत. त्यांचे वडील कित्येक वर्षांपूर्वी बुटखेडा येथे आल्याने ते येथेच स्थायिक झाले होते. अतिशय संघर्षातून रतन नागवे यांनी आपल्या परिवाराला उभे केले. स्वकष्टावर त्यांनी बुटखेडा येथे शेती घेऊन आपली कौटुंबिक स्थिती सुधारली होती. त्यांच्या पश्चात येथील देवीच्या मंदिरात पुजारी असलेल्या आई, पत्नी, दोन मुले, एक भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Jalanaजालनाashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025