शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

‘त्या’ खत कंपन्यांची कसून चौकशी व्हावी- दमानिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 1:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : काही खत उत्पादक कंपन्या सेंद्रिय खतनिर्मिती करताना बनवाट साहित्याचा वापर करून शेतकऱ्यांच्या माथी काहीही ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काही खत उत्पादक कंपन्या सेंद्रिय खतनिर्मिती करताना बनवाट साहित्याचा वापर करून शेतकऱ्यांच्या माथी काहीही मारत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, नांदेड येथील खत कंपनीच्या मालसह अन्य खत उत्पादन करणाºया कारखान्यांची कसून चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाव्दारे केली.बुधवारी दमानिया या परतूर येथील न्यायालयीन कामासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. तसेच जिल्हाधिका-यांची भेट घेऊन निवेदन दिले. गेल्याच आठवड्यात जालन्यातील दोन खत उत्पादन करणा-या कंपन्यांमध्ये बोगस साहित्याचा वापर करून सेंद्रिय खत असल्याचे भासवले जात होते.या संदर्भात कृषी विभागानेच कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित कंपन्यांच्या प्रयोगशाळांचे तसेच त्यांनी उत्पादीत केलेल्या सर्व खतांचे सँपल घेऊन त्याची उच्चस्तरीय तपासणी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.यावेळी त्यांनी राजलक्ष्मी, राधागोविंद, उज्वल, किसान शक्ती, उज्ज्वल बिलेट, सूरजवर्षा इंडट्री आदी कंपन्यांची यादी निवेदनासोबत दिली आहे. या सर्व कंपन्यांवर नांदेड येथील एक बडा उद्योजक संचालक म्हणून कार्य करतो. असेही त्यांनी सांगितले. एकूणच जालन्यातील सिडको प्रकल्पाच्या ज्या जमिनी राजकीय वर्तुळातील जवळच्या व्यक्तींनी खरेदी केल्या आहेत. त्याची चौकशी व्हावी असेही दमानिया यांनी यावेळी सांगितले. त्या जमिनींचे व्यवहार रद्द करून त्या मूळ मालकांना देण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली. परतूर येथील बागेश्वरी कारखान्याच्या व्यवस्थापनावर दमानिया यांनी काही वर्षांपूर्वी गंभीर आरोप केले केले होते, त्या आरोपा बाबत दमानिया यांना बागेश्वरीच्या प्रशासनाने न्यायालयात ओढले आहे. या संदर्भातील खटल्याची सुनावणी गुरूवारी होती, त्यासाठी त्या परतूर येथे आल्या होत्या. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही १७ जुलैला होणार आहे. यावेळी कैलास फुलारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रanjali damaniaअंजली दमानियाfraudधोकेबाजी