शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरही धरणाची गळती थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:33 AM

धरणातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाच्या दुरूस्तीकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव सपकाळ : पावसाळ््यात धामणा धरण तुडुंब भरले होते. याचवेळी धरणाच्या सांडव्याला गळती लागली. त्यानंतर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व धरण समितीने पाहणी करुन सांडव्याची तात्काळ दुरूस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीनंतरही धरणाची पाणी गळती सुरूच आहे. यामुळे धरणातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाच्या दुरूस्तीकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.भोकरदन तालुक्यातील शेलूद येथे धामणा धरण आहे. यावर्षी भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस पडल्याने धामणा धरण ओव्हरफ्लो झाले होते. त्यातच धरणाच्या सांडव्याला अचानक गळती लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धरणाची पाहणी करून तातडीने धरण दुरूस्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यावेळी तज्ज्ञांच्या समितीनेही धरणाची पाहणी केली होती.याला जवळपास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे.मात्र, अद्यापही प्रशासनाने धरणाची दुरूस्ती केली नाही. सध्या धरणाच्या सांडव्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. सध्या धामणा धरणामध्ये ९५ टक्के पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले आहे. या अधिकच्या पाण्यामूळे धरणाच्या भिंतीला तडे जाऊन पूर येईल, या भीतीने त्यावेळी घबराट ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली होती.ऐन पावसाळ््यात ही गंभीर बाब लक्षात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. प्रशासनाने धावपळ करीत धरणाची पाहणी केली.समितीने पाहणी करुन धरणाच्या दुरुस्तीचा अहवाल शासनास सादर केला. परंतु, धरण समितीने पाणी कमी झाल्यानंतर धरणाची दुरूस्ती करण्यात येईल, असे सांगितले होते. सांडव्याची दुरूस्ती करण्याची गरज आहे.

टॅग्स :DamधरणDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प