शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरही धरणाची गळती थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:34 IST

धरणातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाच्या दुरूस्तीकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव सपकाळ : पावसाळ््यात धामणा धरण तुडुंब भरले होते. याचवेळी धरणाच्या सांडव्याला गळती लागली. त्यानंतर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व धरण समितीने पाहणी करुन सांडव्याची तात्काळ दुरूस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीनंतरही धरणाची पाणी गळती सुरूच आहे. यामुळे धरणातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाच्या दुरूस्तीकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.भोकरदन तालुक्यातील शेलूद येथे धामणा धरण आहे. यावर्षी भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस पडल्याने धामणा धरण ओव्हरफ्लो झाले होते. त्यातच धरणाच्या सांडव्याला अचानक गळती लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धरणाची पाहणी करून तातडीने धरण दुरूस्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यावेळी तज्ज्ञांच्या समितीनेही धरणाची पाहणी केली होती.याला जवळपास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे.मात्र, अद्यापही प्रशासनाने धरणाची दुरूस्ती केली नाही. सध्या धरणाच्या सांडव्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. सध्या धामणा धरणामध्ये ९५ टक्के पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले आहे. या अधिकच्या पाण्यामूळे धरणाच्या भिंतीला तडे जाऊन पूर येईल, या भीतीने त्यावेळी घबराट ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली होती.ऐन पावसाळ््यात ही गंभीर बाब लक्षात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. प्रशासनाने धावपळ करीत धरणाची पाहणी केली.समितीने पाहणी करुन धरणाच्या दुरुस्तीचा अहवाल शासनास सादर केला. परंतु, धरण समितीने पाणी कमी झाल्यानंतर धरणाची दुरूस्ती करण्यात येईल, असे सांगितले होते. सांडव्याची दुरूस्ती करण्याची गरज आहे.

टॅग्स :DamधरणDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प