शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरही धरणाची गळती थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:34 IST

धरणातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाच्या दुरूस्तीकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव सपकाळ : पावसाळ््यात धामणा धरण तुडुंब भरले होते. याचवेळी धरणाच्या सांडव्याला गळती लागली. त्यानंतर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व धरण समितीने पाहणी करुन सांडव्याची तात्काळ दुरूस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीनंतरही धरणाची पाणी गळती सुरूच आहे. यामुळे धरणातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाच्या दुरूस्तीकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.भोकरदन तालुक्यातील शेलूद येथे धामणा धरण आहे. यावर्षी भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस पडल्याने धामणा धरण ओव्हरफ्लो झाले होते. त्यातच धरणाच्या सांडव्याला अचानक गळती लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धरणाची पाहणी करून तातडीने धरण दुरूस्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यावेळी तज्ज्ञांच्या समितीनेही धरणाची पाहणी केली होती.याला जवळपास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे.मात्र, अद्यापही प्रशासनाने धरणाची दुरूस्ती केली नाही. सध्या धरणाच्या सांडव्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. सध्या धामणा धरणामध्ये ९५ टक्के पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले आहे. या अधिकच्या पाण्यामूळे धरणाच्या भिंतीला तडे जाऊन पूर येईल, या भीतीने त्यावेळी घबराट ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली होती.ऐन पावसाळ््यात ही गंभीर बाब लक्षात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. प्रशासनाने धावपळ करीत धरणाची पाहणी केली.समितीने पाहणी करुन धरणाच्या दुरुस्तीचा अहवाल शासनास सादर केला. परंतु, धरण समितीने पाणी कमी झाल्यानंतर धरणाची दुरूस्ती करण्यात येईल, असे सांगितले होते. सांडव्याची दुरूस्ती करण्याची गरज आहे.

टॅग्स :DamधरणDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प