शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

दहा एकरांवरील कपाशीवर फिरविला नांगर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:38 IST

वडीगोद्री येथील एका शेतक-याने आता आभाळमाया होणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर घाम गाळून पेरलेल्या पांढ-या सोन्यावर मोठ्या जड अंत:करणाने नांगर फिरविला.

राजू छल्लारे ।लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : पावसाच्या एका सरीसाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला पेरलेल्या पांढऱ्या सोन्याची चिंता लागून आहे. याच चिंतेतून अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील एका शेतक-याने आता आभाळमाया होणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर घाम गाळून पेरलेल्या पांढ-या सोन्यावर मोठ्या जड अंत:करणाने नांगर फिरविला.वडीगोद्री येथील शेतकरी विनोद पिंगळे यांनी त्यांच्या वडीगोद्री व सौंदलगाव शिवारातील १० एकर परिसरावर जुलै पहिल्या आठवड्यात मोठ्या उमेदीने कपाशीची लागवड केली होती. लागवडीनंतर रिमझिम पाऊस झाल्याने पिकांनी माना वर काढल्या होत्या. त्यामुळे त्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु जवळपास २० दिवस पावसाचा खंड पडल्याने माना वर काढलेली पिके कोमेजली होती. आता पुन्हा केव्हा वरूणराजा कृपा करणार आणि पुन्हा आपले शेत हिरवे होणार, या चिंतेने विनोद पिंगळे हे व्यथित झाले होते.एकूणच गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळी झळा सहन करत शेतकरी दरवर्षी नव्या उमेदीने खरीप हंगामाच्या तयारीला लागतो, उसनवारी करून बी-बियाणे, खते खरेदी करून मोठ्या कष्टाने पेरणीही करतो. परंतु पाऊस लांबल्याने त्याच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरले जाते. अशीच परिस्थिती वडीगोद्री, सौंदलगाव परिसरात दिसून आली. यातूनच हताश झालेल्या पिंगळे यांनी २३ जुलै रोजी त्यांच्या शेतातील कपाशीवर नांगर फिरविला.यामुळे जवळपास ६० हजार रूपयांचा पेरणीचा खर्च वाया गेला असून, दुबार पेरणीही आता शक्य नसल्याने रान मोकळे ठेवण्याची वेळ पिंगळे यांच्यावर ओढवली आहे. येत्या आठवडाभरामध्ये जर दमदार पाऊस झाला नाही तर अनेक शेतकऱ्यांवर अशीच नांगर फिरविण्याची वेळ येणार असल्याचे भयावह चित्र दिसून येत आहे.जिल्ह्यात कृत्रिम पावसाची गरजराज्य शासनाकडून कृत्रिम पावसाच्या घोषणा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मध्यंतरी औरंगाबादेतून कृत्रिम पाऊस पाडावा म्हणून यंत्रणाही हलली होती. या पावसासाठी लागणारे तांत्रिक साहित्य विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणारे वातावरणही सध्या किमान जालना जिल्ह्यात दिसून येत नाही.सोलापूर आणि त्या भागामध्ये मंगळवारी कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्याची माहिती देण्यात येत आहे. परंतु जालना, औरंगाबाद या भागात हा प्रयोग कितपत यशस्वी होईल, याबद्दलही शंका घेतली जात आहे.दुबार पेरणी करण्यासाठीची नेमकी तारीखही कृषी विभागाकडून कळविली जात नाही. किती दिवस दुबार पेरणी केली तर चालेल, याची शाश्वती नसल्याने अनेकांनी आपले शेत आता खरिपाऐवजी रबी हंगामासाठी तयार करून ठेवले आहे.

टॅग्स :cottonकापूसdroughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेती