शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

जालन्यात दिंडी मार्गाचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 19:38 IST

महामार्गात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी परतवाडी शिवारातील रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम बंद पाडले. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरा आष्टी पोलीस ठाण्यात चार शेतकऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे परतूर ते माजलगाव दरम्यान  शेगाव-पंढरपूर या राज्य महामार्ग ५४८  चे काम सुरू आहे. महामार्गात जाणाऱ्या मोबदल्यासाठी सदर काम स्थानिक शेतकरी बंद पाडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

आष्टी (जि.जालना) : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात शेगाव-पंढरपूर या दिंडी मार्गाचे काम सुरू आहे. महामार्गात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी परतवाडी शिवारातील रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम बंद पाडले. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरा आष्टी पोलीस ठाण्यात चार शेतकऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शेतकरी आणि प्रशासनात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

 परतूर ते माजलगाव दरम्यान  शेगाव-पंढरपूर या राज्य महामार्ग ५४८  चे काम सुरू आहे. हे काम हैदराबाद येथील कंपनीस शासनाने  दिले आहे.  यासाठी परतवाडी शिवारात रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. महामार्गात जाणाऱ्या मोबदल्यासाठी सदर काम स्थानिक शेतकरी बंद पाडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सोमवार सकाळी ११ च्या  सुमारास अभियंता अतुल अरूण कोटेचा कर्मचारी व पोलिसांसोबत परतवाडी शिवारात रस्ते कामाची पाहणी करत असताना, परतवाडी येथील सोनाजी आढे, नारायण मोती आढे, पांडुरंग सोपा आढे, वसुरुमगाव येथील आप्पा लहाने हे तिथे आले. मुरुम टाकत असलेली शेती आमची असून त्याचा कुठलाही मोबदला शासनाकडून मिळालेला नाही. काम बंद न केल्यास स्वत:ला जाळून घेवू, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. त्यामुळे अभियंता कोटेचा यांच्या फिर्यादीवरून शेतकऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे तीव्र संताप  व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाFarmerशेतकरीhighwayमहामार्गGovernmentसरकार