शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

रोहयो कामात गैरव्यवहार - चंद्रकांत दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:45 AM

भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या अनेक कामांमध्ये निकष डावलून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी शनिवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या अनेक कामांमध्ये निकष डावलून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी शनिवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांच्या दबावाखाली सरकारी यंत्रणा काम करत असल्याचेही चंद्रकांत दानवे यांनी सांगितले.भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात रोहयोतून लाखो रूपयांची कामे सुरू आहेत. ही कामे सुरू असल्याबद्दल आमचा आक्षेप नाही. परंतु, जी कामे सुरू आहेत, ती करताना शासनाच्या निकषाचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. अनेक ठिकाणी जेसीबी, पोकलेनचा उपयोग करून कामे उरकण्यात आली आहेत. एक कि़मी. पाणंद रस्त्यासाठी शासनाच्या निकषानुसार सरासरी चार लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. परंतू, या कामासाठी चक्क २४ लाख रूपयांचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून, असे जवळपास १४९ प्रस्ताव आहेत. या कामांमध्ये उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्याकडून मस्टर मंजूर करण्यात आले आहेत.अनेक धनदांडग्यांना मजूर दाखवण्यात आल्याचा आरोपही दानवे यांनी केला. जे मजूर दाखवले आहेत, त्यातील काहीजण तर रामेश्वर सहकारी साखर कारखान्यात कामाला असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या नावांची यादीही त्यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवली. प्राप्तीकर भरणा-यांनाही मजूर दाखवून त्यांच्यावर पैसे उचलण्यात आल्याचे सांगितले. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आपण थेट मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली आहे. तत्पूर्वी आयुक्त, जिल्हाधिका-यांकडेही तक्रारी दिल्या. मात्र, आमच्या ज्या अधिकाºयांविरूध्द तक्रारी आहेत, त्यांनाच चौकशी करण्यासाठी नेमण्यात येत असल्याने त्यातून काय साध्य होणार असा सवाल करून या सर्व कामांच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुधाकर दानवे, लक्ष्मण ठोंबरे, राजेश म्हस्के, भास्कर घायवट यांची उपस्थिती होती.आरोपात तथ्य नाही : संतोष दानवेपाणंद रस्ते हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्याच महिन्यात या संदर्भातील शासन आदेश रोजगार हमी विभागाकडून निघाला आहे. त्यात दिलेल्या निकषांप्रमाणेच आम्ही रस्त्यांची कामे करत आहोत. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात होत असलेला सर्वांगीण विकास विरोधकांना देखवत नसल्यानेच आमच्यावर हे आरोप केले जात आहेत. हे आरोप त्यांनी आताच कसे केले हा संशोधनाचा विषय असून, त्यांचा बोलविता धनी दुसराच असल्याचे आ. संतोष दानवे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारgovernment schemeसरकारी योजना