शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

बाजारपेठेवर कोरोनाची छाया गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 23:47 IST

कोरोना विषाणूचे परिणाम आता हळूहळू स्थानिक पातळीवर जाणवू लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोरोना विषाणूचे परिणाम आता हळूहळू स्थानिक पातळीवर जाणवू लागले आहेत. मुंबई, पुणे, नाशिकसह अन्य मोठ्या शहरातून बांधकाम क्षेत्रातील कामगार भीतीमुळे आपल्या गावी जात असल्याने स्टीलचे दर दोन दिवसात एक हजार रूपयांनी कमी झाले आहेत.अन्य उत्पादनांवरही त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येते. जालन्यातील बाजारपेठेतील गर्दी तुलनेने कमी झाली असून, आगामी काळात याचा प्रादुर्भाव वाढल्यास मोठी किराणा दुकाने आणि मॉल बंद होणार असल्याच्या धास्तीने किराणा साहित्य जास्तीचे भरून ठेवण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले.कोरोना विषाणूचा रूग्ण जिल्ह्यात आढळलेला नाही. केवळ दोन जणांना संशयाच्या कारणावरून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलली आहेत. असे असले तरी आता नागरिकांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड होऊन अनेकजण घराबाहेर पडणे टाळतांना दिसून येतात. शहरातील रिक्षांमधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाल्याचे रिक्षा चालक संघटनेचे गोपी मोहिदे यांनी सांगितले. जालन्यातून मोठ्या प्रमाणावर घरबांधणीसाठीचे स्टील हे मुंबई, पुणे, नाशिक आणि अन्य मोठ्या शहरांमध्ये जाते. परंतु तेथून मागणी कमी झाली असून, परदेशातून येणारा कच्चा माल अर्थात स्क्रॅबची आवक घटल्याने त्याच्या किमती वाढल्या आहेत.परंतु उत्पादित स्टीलला मागणी नसल्याने किमती घसरून त्या दोन दिवसात ४३ हजार रूपयांवर आल्या आहेत. याच किमती मध्यंतरी ४५ हजार रूपये प्रति टनावर पोहोचल्या होत्या.पुढाकार : घरीच बांधणार रेशीमगाठयेथील स्टील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर अग्रवाल यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त स्वागत समारंभ हा १९ रोजी होणार होता. परंतु आता कोरोनाचा धोका लक्षात घेऊन माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सोमवारी अग्रवाल परिवाराशी चर्चा केली. त्यातच खोतकरांनी स्वत:चे उदाहरण देत मुलगी आणि मुलाचा विवाह साध्या आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थित केल्याचे सांगितले.उद्योजकाच्या मुलाचा कार्यक्रम असल्याने हजारोंच्या संख्येने तेथे गर्दी होणार होती. परंतु जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केलेल्या आवाहनाला आणि खोतकरांच्या आग्रहामुळे आपण आपल्या मुलाचा विवाह हा नियोजित वेळीच घरच्या घरी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती किशोर अग्रवाल यांनी दिली.कोरोनाच्या धास्तीने अनेक विवाह समारंभ साध्या पद्धतीने करण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून आले.शाळेची इमारत घेतली ताब्यातकोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आंबा (ता.परतूर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलची इमारत प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. येथील २० खोल्यांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे नियोजन आहे. तहसीलदार रूपा चित्रक यांच्यासह अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानदेव नवल यांनी दिली.४६ आठवडी बाजारांवर गंडांतरजालना जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जवळपास ४६ आठवडी बाजार भरतात. या आठवडी बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील नागरिकांची ये-जा असते. व्यापारानिमित्त हा बाजार भरविला जातो. कोरोना विषाणूमुळे गर्दी होऊ नये, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्यामुळे आठवडी बाजारावरही जवळपास बंदी आणण्याचा निर्णय झाला आहे.मास्क, हॅन्ड सॅनिटायझरची साठेबाजी नकोकोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी मास्क, हॅन्ड सॅनिटायझरची कृत्रिम टंचाई करणाºयांवर व जादा दराने विक्री करणाºयांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी उत्पादने खरेदी करताना उत्पादन परवाना क्रमांकाची खातरजमा करावी, एन ९५ मास्क खरेदी करताना बिलाची मागणी करावी. अनधिकृत उत्पादित हॅन्ड सॅनिटायझर विक्री करणाºयांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाMarketबाजारMIDCएमआयडीसी