शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

जालना बाजारात आवक वाढूनही तूर, मक्याच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 12:31 IST

बाजारगप्पा : बाजार समितीमध्ये तूर आणि मक्याची आवक सरासरी दोन हजार पोती आहे

- संजय देशमुख ( जालना )

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर आणि मक्याची आवक सरासरी दोन हजार पोती आहे, मात्र आवक वाढताच दरामध्ये अनुक्रमे २०० आणि १०० रुपयांची घसरण झाली आहे. ज्वारी, बाजरी, सोयाबीनची आवक बऱ्यापैकी असली तरी या तिन्हींचे दर स्थिर आहेत. 

जालना जिल्ह्यात कापसाचे दर कोसळले असून, हमी भावपेक्षा ५०० रुपये कमी दराने कापसाची खरेदी होत आहे. मकर संक्रंतीनिमित्त बाजारात गुळाची आवक बऱ्यापैकी असली तरी भाव हे गेल्यावर्षीच्या तुलनेत ३०० रुपयांनी कमी झाले आहेत. बाजारपेठेत बाजरी २०० पोती, ज्वारी ३०० पोती, नवीन तूर २००० हजार पोती आणि मकादेखील २००० पोती आवक आहे. मक्याचे भाव हे १५०० ते १६०० रुपये असून, यात शंभर रुपयांची घसरण झाली आहे.

ज्वारीच्या भावातही २०० रुपयांची घसरण असून, तुरीचे दरही सरासरी २०० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे बाजारातून तेजीची आशा करणे आता अवघड झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तूरडाळ, चनाडाळची आवक बऱ्यापैकी असली तरी यातही सरासरी शंभर ते ३०० रुपयांची घसरण झाली आहे. 

बाजारपेठेत सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरू केले असून, हमीभाव ५ हजार ४०० रुपये आहे. मात्र, हा भाव उच्च दर्जाच्या कापसाला देण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस दर्जेदार नसल्याचे सांगून त्यांना कमी भाव मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. खासगी व्यापाऱ्यांकडून देखील कापसाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, शेतकऱ्यांकडून कमी भावाने कापूस खरेदी केली जात आहे. ग्रामीण भागात परिस्थितीमुळे मेटाकुटीला येत शेतकरी कमी किंमतीत पशुधन विक्री करीत आहेत.

सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रात २८ दिवसांत केवळ ३ हजार ५०० क्विंटल एवढा कमी कापूस खरेदी झाला आहे. या केंद्रावर कापूस खरेदी करताना त्यात प्रारंभी किती ओलावा आहे, हे मोश्चर मशीनद्वारे तपासून घेतला जात आहे. त्यात ८ ते १२ टक्क्यांपर्यंत ओलावा असल्यास तो कापूस खरेदी केला जातो. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांनी आणलेल्या कापसात या टक्केवारीपेक्षा कितीतरी पट अधिक ओलावा दिसून येत असल्याने कापूस परत करण्याची वेळ केंद्रावर येत असल्याचे  दिसून येते.

सोयाबीनची आवक आता मंदावली असून, ती केवळ ५०० पोती येत आहे. याला ३ हजार ३०० रुपयांचा दर मिळत आहे. साखरेचा कोटा गेल्या महिन्यांच्या तुलनेत एक लाख टनांनी कमी केला असून, साखरेचे दर स्थिर आहेत. यंदा जानेवारी महिन्यासाठी केंद्र सरकारने १८ लाख टनांचा कोटा जाहीर केला आहे. 

जालन्यातील बाजारपेठेत गुळाची आवक चांगली असली, तरी भाव पाहिजे तसे नसल्याचे गूळ असोसिएशनचे सचिव गोविंद सराटे यांनी सांगितले. संक्रांत अद्याप पंधरा दिवस दूर असली तरी तिळाचे भाव हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहोचले असून, किरकोळ बाजारपेठेत १८० रुपये किलोने विक्री होत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी