शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

जालना बाजारात आवक वाढूनही तूर, मक्याच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 12:31 IST

बाजारगप्पा : बाजार समितीमध्ये तूर आणि मक्याची आवक सरासरी दोन हजार पोती आहे

- संजय देशमुख ( जालना )

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर आणि मक्याची आवक सरासरी दोन हजार पोती आहे, मात्र आवक वाढताच दरामध्ये अनुक्रमे २०० आणि १०० रुपयांची घसरण झाली आहे. ज्वारी, बाजरी, सोयाबीनची आवक बऱ्यापैकी असली तरी या तिन्हींचे दर स्थिर आहेत. 

जालना जिल्ह्यात कापसाचे दर कोसळले असून, हमी भावपेक्षा ५०० रुपये कमी दराने कापसाची खरेदी होत आहे. मकर संक्रंतीनिमित्त बाजारात गुळाची आवक बऱ्यापैकी असली तरी भाव हे गेल्यावर्षीच्या तुलनेत ३०० रुपयांनी कमी झाले आहेत. बाजारपेठेत बाजरी २०० पोती, ज्वारी ३०० पोती, नवीन तूर २००० हजार पोती आणि मकादेखील २००० पोती आवक आहे. मक्याचे भाव हे १५०० ते १६०० रुपये असून, यात शंभर रुपयांची घसरण झाली आहे.

ज्वारीच्या भावातही २०० रुपयांची घसरण असून, तुरीचे दरही सरासरी २०० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे बाजारातून तेजीची आशा करणे आता अवघड झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तूरडाळ, चनाडाळची आवक बऱ्यापैकी असली तरी यातही सरासरी शंभर ते ३०० रुपयांची घसरण झाली आहे. 

बाजारपेठेत सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरू केले असून, हमीभाव ५ हजार ४०० रुपये आहे. मात्र, हा भाव उच्च दर्जाच्या कापसाला देण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस दर्जेदार नसल्याचे सांगून त्यांना कमी भाव मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. खासगी व्यापाऱ्यांकडून देखील कापसाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, शेतकऱ्यांकडून कमी भावाने कापूस खरेदी केली जात आहे. ग्रामीण भागात परिस्थितीमुळे मेटाकुटीला येत शेतकरी कमी किंमतीत पशुधन विक्री करीत आहेत.

सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रात २८ दिवसांत केवळ ३ हजार ५०० क्विंटल एवढा कमी कापूस खरेदी झाला आहे. या केंद्रावर कापूस खरेदी करताना त्यात प्रारंभी किती ओलावा आहे, हे मोश्चर मशीनद्वारे तपासून घेतला जात आहे. त्यात ८ ते १२ टक्क्यांपर्यंत ओलावा असल्यास तो कापूस खरेदी केला जातो. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांनी आणलेल्या कापसात या टक्केवारीपेक्षा कितीतरी पट अधिक ओलावा दिसून येत असल्याने कापूस परत करण्याची वेळ केंद्रावर येत असल्याचे  दिसून येते.

सोयाबीनची आवक आता मंदावली असून, ती केवळ ५०० पोती येत आहे. याला ३ हजार ३०० रुपयांचा दर मिळत आहे. साखरेचा कोटा गेल्या महिन्यांच्या तुलनेत एक लाख टनांनी कमी केला असून, साखरेचे दर स्थिर आहेत. यंदा जानेवारी महिन्यासाठी केंद्र सरकारने १८ लाख टनांचा कोटा जाहीर केला आहे. 

जालन्यातील बाजारपेठेत गुळाची आवक चांगली असली, तरी भाव पाहिजे तसे नसल्याचे गूळ असोसिएशनचे सचिव गोविंद सराटे यांनी सांगितले. संक्रांत अद्याप पंधरा दिवस दूर असली तरी तिळाचे भाव हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहोचले असून, किरकोळ बाजारपेठेत १८० रुपये किलोने विक्री होत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी