शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:43 IST

भोकरदन शहरासह २५ गावांना पाणीपुरवठा करणारे जुई धरण कोरडेठाक झाल्याने शहरासह परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन शहरासह २५ गावांना पाणीपुरवठा करणारे जुई धरण कोरडेठाक झाल्याने शहरासह परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. असे असताना प्रशासन कुठल्याही हालचाली करीत नसल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने जुई धरणात पाणी आले नाही. शिवाय शेलूद येथील धामणा धरण सुध्दा कोरडेठाक आहे. त्यामुळे या धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या भोकरदन शहरासह २५ गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या या गावांना पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होत असून, सप्टेंबरमध्येच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पंधरा दिवसांपूर्वीच जिल्हाधिका-यांच्या आदेशावरून उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी धरणाला भेट देऊन पाहणी केली होती. परंतु, अद्यापही प्रशासनाने काहीच पावले उचलेली नाही.दरम्यान, यावर्षी पावसाळा संपत आला आहे. मात्र, अद्यापही तालुक्यात जोरदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पिके संकटात सापडली आहेत.

टॅग्स :Damधरणdroughtदुष्काळ