शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

भोकरदनमध्ये तिखट मिरची शेतकऱ्यांसाठी ठरतेय गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:56 IST

एप्रिल महिन्यामध्ये ज्या शेतक-यांनी मिरचीची लागवड केली. त्या शेतक-यांना फायदा झाला असून सध्या तालुक्यात मिरचीला चांगला भाव मिळत असल्यामुळे येथील शेतक-यांना अच्छे दिन पाहायला मिळत आहेत.

फकिरा देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात एप्रिल महिन्यामध्ये ज्या शेतक-यांनी मिरचीची लागवड केली. त्या शेतक-यांना फायदा झाला असून सध्या तालुक्यात मिरचीला चांगला भाव मिळत असल्यामुळे येथील शेतक-यांना अच्छे दिन पाहायला मिळत आहेत.गेल्यावर्षी बोंडअळीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट निर्माण झाली होती. मात्र मिरची उत्पादक शेतक-यांना गेल्यावर्षीचा खरीप हंगाम चांगला राहिला असल्यामुळे यावर्षी तालुक्यातील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरचीची लागवड केली. त्यामध्ये ईगल, तेजा-४ या जातीच्या मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरचीची लागवड दुप्पट झाली आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी जवळपास २ हजार ५०० हेक्टरमध्ये मिरचीची लागवड करण्यात आली.त्यामध्ये सुध्दा ज्या शेतक-यांनी एप्रिल महिन्यामध्ये मिरचीची लागवड केली. अशा शेतक-यांच्या मिरचीचे पीक चांगलेच बहरून आले असून, सध्या या मिरचीला ४ हजार प्रतिक्विंटल रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे तर सुरुवातीलच मिरचीला ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे तर भोकरदन तालुक्यातील भोकरदन, पिंपळगाव रेणुकाई, दानापूर, आन्वा, वालसावंगी, सिपोरा बजार येथील व्यापारीही मोठ्या प्रमाणात मिरची खरेदी करीत आहे. भोकरदन शहरात सोमवारपासून मिरची खरेदीला सुरूवात झाली. येथील बाजार पेठेमध्ये ३ हजार ५०० ते ४ हजार रूपयांपर्यंत मिरचीला भाव मिळत आहे. त्यामुळे येथील शेतकरी आनंदात दिसत आहे.यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त होती. शिवाय मल्चिंग पेपरच्या तापमानामुळे बहुतांश शेतक-यांचे मिरचीचे पीक खराब झाले. तर काही ठिकाणी चुरडा - मुरडा रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मिरची उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला. परिणामी कठोराबाजार येथील शेतक-यांनी मिरची उपटून टाकली. मात्र ज्या शेतक-यांनी मिरचीच्या पीकांची काळजी घेऊन मिरचीचे पीक जोपासले, अशा शेतक-यांना तिखट मिरचीपासून सुध्दा चांगला गोडवा मिळण्यास सुरूवात झाली आहे.भोकरदन तालुक्यातील शेषराव सपकाळ, महादू तळेकर, कैलास सुसर या शेतक-यांच्या शेतातील मिरचीचे पीक चांगलेच बहरून आले आहे़ तसेच भोकरदन ते पेरजापूर रोडवरील कैलास सुसर यांनी १४ एप्रिल रोजी दीड एकर क्षेत्रामध्ये ठिंबक सिंचन व मल्चिंग पेपरवर मिरचीची लागवड केली होती. सध्या मिरचीच्या उत्पादनाला सुरुवात झाली असून त्यांच्या मिरचीला ४ हजार रुपये प्रतिक्टिंलच्या भावाची मागणी व्यापारी करीत आहे. त्यामुळे बोंडअळीने हैराण झालेल्या शेतक-यांना मिरचीने चांगला आधार दिला आहे. यावर्षी मिरची लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीweatherहवामान