शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

भोकरदनमध्ये तिखट मिरची शेतकऱ्यांसाठी ठरतेय गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:56 IST

एप्रिल महिन्यामध्ये ज्या शेतक-यांनी मिरचीची लागवड केली. त्या शेतक-यांना फायदा झाला असून सध्या तालुक्यात मिरचीला चांगला भाव मिळत असल्यामुळे येथील शेतक-यांना अच्छे दिन पाहायला मिळत आहेत.

फकिरा देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात एप्रिल महिन्यामध्ये ज्या शेतक-यांनी मिरचीची लागवड केली. त्या शेतक-यांना फायदा झाला असून सध्या तालुक्यात मिरचीला चांगला भाव मिळत असल्यामुळे येथील शेतक-यांना अच्छे दिन पाहायला मिळत आहेत.गेल्यावर्षी बोंडअळीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट निर्माण झाली होती. मात्र मिरची उत्पादक शेतक-यांना गेल्यावर्षीचा खरीप हंगाम चांगला राहिला असल्यामुळे यावर्षी तालुक्यातील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरचीची लागवड केली. त्यामध्ये ईगल, तेजा-४ या जातीच्या मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरचीची लागवड दुप्पट झाली आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी जवळपास २ हजार ५०० हेक्टरमध्ये मिरचीची लागवड करण्यात आली.त्यामध्ये सुध्दा ज्या शेतक-यांनी एप्रिल महिन्यामध्ये मिरचीची लागवड केली. अशा शेतक-यांच्या मिरचीचे पीक चांगलेच बहरून आले असून, सध्या या मिरचीला ४ हजार प्रतिक्विंटल रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे तर सुरुवातीलच मिरचीला ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे तर भोकरदन तालुक्यातील भोकरदन, पिंपळगाव रेणुकाई, दानापूर, आन्वा, वालसावंगी, सिपोरा बजार येथील व्यापारीही मोठ्या प्रमाणात मिरची खरेदी करीत आहे. भोकरदन शहरात सोमवारपासून मिरची खरेदीला सुरूवात झाली. येथील बाजार पेठेमध्ये ३ हजार ५०० ते ४ हजार रूपयांपर्यंत मिरचीला भाव मिळत आहे. त्यामुळे येथील शेतकरी आनंदात दिसत आहे.यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त होती. शिवाय मल्चिंग पेपरच्या तापमानामुळे बहुतांश शेतक-यांचे मिरचीचे पीक खराब झाले. तर काही ठिकाणी चुरडा - मुरडा रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मिरची उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला. परिणामी कठोराबाजार येथील शेतक-यांनी मिरची उपटून टाकली. मात्र ज्या शेतक-यांनी मिरचीच्या पीकांची काळजी घेऊन मिरचीचे पीक जोपासले, अशा शेतक-यांना तिखट मिरचीपासून सुध्दा चांगला गोडवा मिळण्यास सुरूवात झाली आहे.भोकरदन तालुक्यातील शेषराव सपकाळ, महादू तळेकर, कैलास सुसर या शेतक-यांच्या शेतातील मिरचीचे पीक चांगलेच बहरून आले आहे़ तसेच भोकरदन ते पेरजापूर रोडवरील कैलास सुसर यांनी १४ एप्रिल रोजी दीड एकर क्षेत्रामध्ये ठिंबक सिंचन व मल्चिंग पेपरवर मिरचीची लागवड केली होती. सध्या मिरचीच्या उत्पादनाला सुरुवात झाली असून त्यांच्या मिरचीला ४ हजार रुपये प्रतिक्टिंलच्या भावाची मागणी व्यापारी करीत आहे. त्यामुळे बोंडअळीने हैराण झालेल्या शेतक-यांना मिरचीने चांगला आधार दिला आहे. यावर्षी मिरची लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीweatherहवामान