शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

बालपण गुन्हेगारीत अडकतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

जालना : आज विविध गुन्हेगारी कृत्यामुळे अल्पवयीन मुले आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहत आहेत. हाणामारीतील काही तक्रारी पोलीस ठाण्यात ...

जालना : आज विविध गुन्हेगारी कृत्यामुळे अल्पवयीन मुले आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहत आहेत. हाणामारीतील काही तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होतात. तर अनेक तक्रारींमध्ये पोलीस आपापसात समेट घडविला जातो. समेट घडविताना पोलिसांकडून मुलांसह पालकांचे समुपदेशन केले जाते. परंतु, विविध कारणांनी अल्पवयीन मुले आरोपी होण्याचे प्रकार सुरूच आहे.

स्पर्धेच्या युगात मुलांकडे लक्ष द्यायला पालकांकडे वेळ नाही. कोणी नोकरीला, कोणी मजुरीला तर कोणी इतर कामानिमित्त घरातून बाहेर असतो. कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी महिलाही आता नोकरी किंवा घरगुती व्यवसाय करू लागल्या आहेत. त्यामुळे मुले घराबाहेर गेल्यानंतर करतात तरी काय ? याचा थांगपत्ता अनेक पालकांना लागत नाही. एखादी घटना घडली आणि कोणी तक्रार घेऊन घरी आले तरच मुलांची भांडणे झाल्याचे पालकांना समजते. विशेषत: माध्यमिक, उच्च माध्यमिकचे शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये हाणामारीचे प्रकार वाढले आहेत.

हाणामारीशिवाय घरफोड्यांसह इतर चोऱ्यांमध्येही लहान मुले आरोपी म्हणून आढळत आहेत. कायद्यानुसार अशा मुलांना न्यायालय बालसुधारगृहात पाठविते. परंतु, बालसुधारगृहातून बाहेर येणारी काही मुले नंतर गुन्हेगारी कृत्य करीत नाहीत. तर काही मुले पुन्हा गुन्हेगारी कृत्याकडे वळत असल्याचे पोलिसांसमोर येणाऱ्या काही घटनांवरून दिसून येते. समुपदेशनानंतरही बालगुन्हेगारी वाढत असल्याने पोलिसांसमोरही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

बालमनावर मोठ्यांच्या चिडचिडेपणाचा परिणाम

आज अनेक मुलं हट्टी होत चालली आहेत. मुलांनी एखादी वस्तू मागितली आणि ती नाही मिळाली तर त्यांच्यातील चिडचिडेपणा वाढतो किंवा एखाद्या गोष्टीवरून पालक सतत त्यांना विचारणा करीत असतील तर त्या बालमनावरही मोठा परिणाम होतो. त्यामुळे त्यांचा चिडचिडेपणा, राग वाढू वाढू लागतो. घराबाहेर पडणारी ही मुलं आपल्या रागाच्या भरात भांडण-तंटे करू लागतात. मुलांना अशा कृत्यापासून दूर ठेवण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची आहे.

कायद्यातील तरतुदी

एखाद्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलगा, मुलगी आढळून आली तर पोलीस त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करतात. न्यायालयही त्यांची बालसुधारगृहात रवानगी करते. बालसुधारगृहात तज्ज्ञांमाफर्त मुलांचे समुपदेशन करून त्यांना गुन्हेगारी कृत्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात.