शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

बालपण गुन्हेगारीत अडकतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

जालना : आज विविध गुन्हेगारी कृत्यामुळे अल्पवयीन मुले आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहत आहेत. हाणामारीतील काही तक्रारी पोलीस ठाण्यात ...

जालना : आज विविध गुन्हेगारी कृत्यामुळे अल्पवयीन मुले आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहत आहेत. हाणामारीतील काही तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होतात. तर अनेक तक्रारींमध्ये पोलीस आपापसात समेट घडविला जातो. समेट घडविताना पोलिसांकडून मुलांसह पालकांचे समुपदेशन केले जाते. परंतु, विविध कारणांनी अल्पवयीन मुले आरोपी होण्याचे प्रकार सुरूच आहे.

स्पर्धेच्या युगात मुलांकडे लक्ष द्यायला पालकांकडे वेळ नाही. कोणी नोकरीला, कोणी मजुरीला तर कोणी इतर कामानिमित्त घरातून बाहेर असतो. कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी महिलाही आता नोकरी किंवा घरगुती व्यवसाय करू लागल्या आहेत. त्यामुळे मुले घराबाहेर गेल्यानंतर करतात तरी काय ? याचा थांगपत्ता अनेक पालकांना लागत नाही. एखादी घटना घडली आणि कोणी तक्रार घेऊन घरी आले तरच मुलांची भांडणे झाल्याचे पालकांना समजते. विशेषत: माध्यमिक, उच्च माध्यमिकचे शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये हाणामारीचे प्रकार वाढले आहेत.

हाणामारीशिवाय घरफोड्यांसह इतर चोऱ्यांमध्येही लहान मुले आरोपी म्हणून आढळत आहेत. कायद्यानुसार अशा मुलांना न्यायालय बालसुधारगृहात पाठविते. परंतु, बालसुधारगृहातून बाहेर येणारी काही मुले नंतर गुन्हेगारी कृत्य करीत नाहीत. तर काही मुले पुन्हा गुन्हेगारी कृत्याकडे वळत असल्याचे पोलिसांसमोर येणाऱ्या काही घटनांवरून दिसून येते. समुपदेशनानंतरही बालगुन्हेगारी वाढत असल्याने पोलिसांसमोरही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

बालमनावर मोठ्यांच्या चिडचिडेपणाचा परिणाम

आज अनेक मुलं हट्टी होत चालली आहेत. मुलांनी एखादी वस्तू मागितली आणि ती नाही मिळाली तर त्यांच्यातील चिडचिडेपणा वाढतो किंवा एखाद्या गोष्टीवरून पालक सतत त्यांना विचारणा करीत असतील तर त्या बालमनावरही मोठा परिणाम होतो. त्यामुळे त्यांचा चिडचिडेपणा, राग वाढू वाढू लागतो. घराबाहेर पडणारी ही मुलं आपल्या रागाच्या भरात भांडण-तंटे करू लागतात. मुलांना अशा कृत्यापासून दूर ठेवण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची आहे.

कायद्यातील तरतुदी

एखाद्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलगा, मुलगी आढळून आली तर पोलीस त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करतात. न्यायालयही त्यांची बालसुधारगृहात रवानगी करते. बालसुधारगृहात तज्ज्ञांमाफर्त मुलांचे समुपदेशन करून त्यांना गुन्हेगारी कृत्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात.