शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

निषेधाने गाजला मुख्यमंत्र्यांचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:27 IST

मुख्यमंत्र्यांचा दौरा अवघ्या २४ तासांत ठरल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने ही दुष्काळी आढावा बैठक घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुख्यमंत्र्यांचा दौरा अवघ्या २४ तासांत ठरल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने ही दुष्काळी आढावा बैठक घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.शनिवारी या बैठकीचे आयोजन करताना पोलिसांनी जो तगडा बंदोबस्त लावला होता, त्याचा मोठा फटका सामान्य नागरिकांसह वकील, न्यायिक अधिकाऱ्यांना बसल्याने एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देण्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि पोलिसांमध्ये आधी शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर नंतर सौम्य लाठीमारात झाल्याने गोंधळात भर पडली.जिल्ह्यात केवळ ६१ टक्केच पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली होती. त्या पार्श्वभूमीवर पूर्वी ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी जालना दौºयावर येऊन दुष्काळी स्थितीचा आढावा घ्यावा यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन २४तासांत त्यांचा दौरा निश्चित करून तसे निर्देश जिल्हाधिका-यांना दिले होते. हे निर्देश मिळताच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तातडीने सर्व विभागप्रमुखांना सूचित करून माहिती अपडेट ठेवण्याचे निर्देश दिले होते.शनिवारी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर १२.२० मिनिटांनी जालन्यात उतरले. त्यानंतर त्यांनी तेथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण केले. यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, जि.प. सदस्य जयमंगल जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देण्याचा आग्रह धरला.त्यातूनच भोकरदनचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये यांच्या सोबत वाद झाला. यातूनच चिडलेल्या पोलिसांनी राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांची धरपकड करून सौम्य लाठीमार केला. यामुळे वातावरण संतप्त झाले होते. जयमंगल जाधव यांना हाताला जबर मार लागला असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.वकिलांनी नोंदवला निषेधशनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने वाहतुकीत बदल केले होते. तसेच न्यायालयत जाण्यासाठीच्या मार्गावरून न्यायिक अधिकाºयांसह वकिलांना प्रतिबंध करण्यात आल्याने मोठी अडचण झाली. यामुळे काही ठिकाणी पोलीस आणि वकिलांमध्ये शाब्दिक वादही झाले. या संदर्भात वकिलांच्या शिष्टमंडळाने प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीशांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तसेच न्यायालयाच्या परिसरात सर्वांनी एकत्रित येऊन पोलिसांच्या अरेरावीचा निषेध नोंदविला.पोलिसांच्या या भूमिकेचा फटका हा पक्षकारांनाही बसला. त्यांना न्यायालयात येताना अनेक अउच्णींना तोंड द्यावे लागले.निषेध नोंदविणा-यांमध्ये जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक तारडे, अ‍ॅड. सी. डी. देशपांडे, अ‍ॅड. सुरेश कुलकर्णी, अ‍ॅड. किशोर राऊत, अ‍ॅड. एन. डी. देशपांडे, अ‍ॅड. आर. जी. देशमुख, अ‍ॅड. गजानन मांटे, अ‍ॅड. संजीव गायकवाड, अ‍ॅड. रमेश उंचे, अ‍ॅड. लक्ष्मण उढाण, अ‍ॅड. शैलेश देशमुख, अ‍ॅड. डी. के. कुलकर्णी, अ‍ॅड. रोहित बनवसकर, अ‍ॅड. सुमित मोरे, अ‍ॅड. प्रज्ञेश कुलकर्णी, अ‍ॅड. दत्तात्रय लिखे, अ‍ॅड. संदीप घुगे, अ‍ॅड. अभिषेक सतकर, अ‍ॅड. दीपिका ढवले, अ‍ॅड. चित्रा वाघ यांच्यासह अन्य वकिलांची यावेळी उपस्थिती असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीagitationआंदोलन