शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

केंद्रीय पथकाचा दौरा सोपस्कार ठरू नये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:38 IST

नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकातील अधिकारी रविवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आधी पावसाच्या प्रतीक्षेने आणि नंतर पावसाच्या कहरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खरिपाचे उत्पन्न घटले असून, दर्जा घसरल्याने सोयाबीन आणि मका कवडीमोल भावाने विक्री करावी लागली. आता कपाशीचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकातील अधिकारी रविवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यात सहा गावांना भेटी देऊन पिकांची स्थिती जाणून घेणार आहेत. यापूर्वीही असे पथक आले होते, त्याचा कुठलाच लाभ झाला नाही, त्यामुळे हे पथक येऊन आमच्या पदरात काय पडणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.जालना जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून सततच्या दुष्काळामुळे शेतकरी संकटातच आहे. मध्यंतरी राज्य सरकारने जी दीड लाख रूपयांची कर्जमाफी जाहीर केली होती, त्यातील अनेक शेतकरी अद्याही या योजनेपासून वंचित असल्याचे वास्तव आहे. त्यातच पीकविमा कंपन्यांनी विमाहप्ता भरतांना जी रक्कम वसूल केली, त्या तुलनेत नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये केंद्राचे पथक पाहणी दौ-यावर आले होते. त्यावेळी कोरडा दुष्काळ होता आणि आता परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याची पाहणी करण्यासाठी हे अधिकारी रविवारी जालना जिल्ह्यातील केळीगव्हाण, दरेगाव, पिंपळगाव थोटे, चांदई एक्को, गवळी पोखरी आणि अकोला देव या गावांना भेटी देणार आहे.या भेटी दरम्यान ते प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करणार असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी त्या-त्या तालुक्यातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना सतर्क राहण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.फळबागांनाही भेटी द्याव्यातरविवारी केंद्रीय पथकाचे अधिकारी दौ-यावर येत आहेत. या अधिका-यांनी फळबागांना भेटी द्याव्यात, अशी मागणी कडवंची येथील सरपंच चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर या अवकाळी पावसामुळे डाळिंब तसेच मोसंबी बागांचेही मोठे नुकसान झाले असून, त्या-त्या भागातील फळबागांनाही पथकातील अधिका-यांनी भेटी द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसFarmerशेतकरी