शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

केंद्रीय पथकाचा दौरा सोपस्कार ठरू नये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:38 IST

नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकातील अधिकारी रविवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आधी पावसाच्या प्रतीक्षेने आणि नंतर पावसाच्या कहरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खरिपाचे उत्पन्न घटले असून, दर्जा घसरल्याने सोयाबीन आणि मका कवडीमोल भावाने विक्री करावी लागली. आता कपाशीचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकातील अधिकारी रविवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यात सहा गावांना भेटी देऊन पिकांची स्थिती जाणून घेणार आहेत. यापूर्वीही असे पथक आले होते, त्याचा कुठलाच लाभ झाला नाही, त्यामुळे हे पथक येऊन आमच्या पदरात काय पडणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.जालना जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून सततच्या दुष्काळामुळे शेतकरी संकटातच आहे. मध्यंतरी राज्य सरकारने जी दीड लाख रूपयांची कर्जमाफी जाहीर केली होती, त्यातील अनेक शेतकरी अद्याही या योजनेपासून वंचित असल्याचे वास्तव आहे. त्यातच पीकविमा कंपन्यांनी विमाहप्ता भरतांना जी रक्कम वसूल केली, त्या तुलनेत नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये केंद्राचे पथक पाहणी दौ-यावर आले होते. त्यावेळी कोरडा दुष्काळ होता आणि आता परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याची पाहणी करण्यासाठी हे अधिकारी रविवारी जालना जिल्ह्यातील केळीगव्हाण, दरेगाव, पिंपळगाव थोटे, चांदई एक्को, गवळी पोखरी आणि अकोला देव या गावांना भेटी देणार आहे.या भेटी दरम्यान ते प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करणार असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी त्या-त्या तालुक्यातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना सतर्क राहण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.फळबागांनाही भेटी द्याव्यातरविवारी केंद्रीय पथकाचे अधिकारी दौ-यावर येत आहेत. या अधिका-यांनी फळबागांना भेटी द्याव्यात, अशी मागणी कडवंची येथील सरपंच चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर या अवकाळी पावसामुळे डाळिंब तसेच मोसंबी बागांचेही मोठे नुकसान झाले असून, त्या-त्या भागातील फळबागांनाही पथकातील अधिका-यांनी भेटी द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसFarmerशेतकरी