शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

केंद्रीय पथकाचा दौरा सोपस्कार ठरू नये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:38 IST

नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकातील अधिकारी रविवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आधी पावसाच्या प्रतीक्षेने आणि नंतर पावसाच्या कहरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खरिपाचे उत्पन्न घटले असून, दर्जा घसरल्याने सोयाबीन आणि मका कवडीमोल भावाने विक्री करावी लागली. आता कपाशीचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकातील अधिकारी रविवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यात सहा गावांना भेटी देऊन पिकांची स्थिती जाणून घेणार आहेत. यापूर्वीही असे पथक आले होते, त्याचा कुठलाच लाभ झाला नाही, त्यामुळे हे पथक येऊन आमच्या पदरात काय पडणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.जालना जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून सततच्या दुष्काळामुळे शेतकरी संकटातच आहे. मध्यंतरी राज्य सरकारने जी दीड लाख रूपयांची कर्जमाफी जाहीर केली होती, त्यातील अनेक शेतकरी अद्याही या योजनेपासून वंचित असल्याचे वास्तव आहे. त्यातच पीकविमा कंपन्यांनी विमाहप्ता भरतांना जी रक्कम वसूल केली, त्या तुलनेत नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये केंद्राचे पथक पाहणी दौ-यावर आले होते. त्यावेळी कोरडा दुष्काळ होता आणि आता परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याची पाहणी करण्यासाठी हे अधिकारी रविवारी जालना जिल्ह्यातील केळीगव्हाण, दरेगाव, पिंपळगाव थोटे, चांदई एक्को, गवळी पोखरी आणि अकोला देव या गावांना भेटी देणार आहे.या भेटी दरम्यान ते प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करणार असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी त्या-त्या तालुक्यातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना सतर्क राहण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.फळबागांनाही भेटी द्याव्यातरविवारी केंद्रीय पथकाचे अधिकारी दौ-यावर येत आहेत. या अधिका-यांनी फळबागांना भेटी द्याव्यात, अशी मागणी कडवंची येथील सरपंच चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर या अवकाळी पावसामुळे डाळिंब तसेच मोसंबी बागांचेही मोठे नुकसान झाले असून, त्या-त्या भागातील फळबागांनाही पथकातील अधिका-यांनी भेटी द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसFarmerशेतकरी