शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

लग्नाळू तरुणांना फसवणारी टोळी पकडली; वर पक्षाकडून लग्नासाठी २ लाख घेऊन करायचे फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 19:11 IST

लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी पकडली; पाच महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल

टेंभुर्णी (जालना ) : लग्नासाठी इच्छुक तरुणांच्या नातेवाईकांकडून पैसे घेऊन त्यांची नंतर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश टेंभुर्णी पोलिसांनी सोमवारी केला. याप्रकरणी पाच महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने लग्नासाठी मुली दाखवून अनेक तरुणांना फसवल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथे सविता माळीच्या शेतात लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी आल्याची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र ठाकरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने माळीच्या शेतात धाड टाकली. पोलिसांना पाहताच तेथील लोकांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली.  यावेळी औरंगाबाद येथून मुलीचे स्थळ दाखवून भडगाव ( जि.जळगाव) व फुलंब्री (औरंगाबाद ) येथील दोन युवकांना लग्नासाठी बोलाविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही तरुणांना प्रत्येकी दोन लाख रुपये घेऊन लग्नासाठी त्यांच्या कुटुंबासह बोलावून घेतले होते. परंतु,  दोन्ही वर पक्ष एकाच वेळी समोरासमोर आल्याने टोळीचा भांडाफोड झाला. 

दोघांमध्ये वाद झाल्याने लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचा प्रकार उघड झाला. या प्रकरणात जळगाव येथील वधू पक्षाकडील लोकांनी लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याबाबत सविता राधाकिसन माळी, अनिल राधाकिसन माळी (रा. सातेफळ), सुनिता बाळूमामा माळी (रा.सावंगी वरगणे), सुषमा सुभाष बेळगे (रा. पवन नगर, वाळूज पंढरपूर ), अनिल जगन्नाथ बनकर (  रा. शृंगारवाडी ), शिला मनोहर बनकर (रा. एकतुनी ता.पैठण), शितल बाबुराव निकम (रा.विसरवाडी ता.पैठण ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. 

सूत्रधार फरार, फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस येणार या सातही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या मोबाईलमध्ये विविध मुलामुलींचे बायोडाटा आढळून आले आहेत. धुळे, औरंगाबाद, जळगाव, परभणी, नांदेड येथील काही तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून  फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यातील मुख्य आरोपी सूत्रधार सविता माळी फरार असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ही कारवाई सपोनि रविंद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक सतीश दिंडे, पोलीस कर्मचारी पंडित गवळी, वसुंधरा भांडेकर, छाया निकम, अशोक घोंगे, प्रदीप धोंडगे, सागर शिवरकर, हरी शिरसागर, गजेंद्र भुतेकर ,मंगेश शिंदे , गणेश खाडे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीJalanaजालना