शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

बनावट खतसाठा प्रकरणात कारखान्याच्या मालकांविषयी इतकी सहानुभूती कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 15:36 IST

दोन दिवसांनंतरही तपासाला गती नाही

- गजानन वानखडे जालना : कोणत्याही कारखान्याला परवाना देताना त्याच्या मालकासह सर्व इत्थंभूत माहिती कृषी अधीक्षक कार्यालयात घेतली जाते. असे असताना जालन्यात उघडकीस आलेल्या बनावट सेंद्रिय खत प्रकरणात जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी अद्यापही संबंधित कारखान्याच्या मालकाच्या नावाने तक्रार दिलेली नाही. त्यामुळे मालकांविषयी इतकी सहानुभूती कशासाठी, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. 

दोन दिवसापासून चंदनझिरा पोलिसात फिर्याद दाखल होऊनही शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळणारे महाभाग अद्यापही पोलिसांच्या हातात लागलेले नाहीत.  कृषी विभाग आणि पोलिसांच्या कलगीतुऱ्यामुळे तपासाला अद्यापही गती न मिळाल्याने सर्वसामान्यात संताप आहे.

जालन्यापासून जवळच असलेल्या गुंडेवाडी येथील राजलक्ष्मी फर्टिलायझरच्या गोदामावर ४ मे रोजी कृषी विभागाने छापा मारुन तब्बल ६३ लाख रुपयांचा बनावट खताचा साठा जप्त केला होता. या खतामध्ये लिंबोळी तसेच पिकांच्या वाढीसाठी पोषक पदार्थ असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात या खतांच्या नमुन्याची तपासणी केली असता, ते सर्व बनावट आढळून आले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी ५ मे रोजी कृषी विभागाने चंदनझिरा परिसरातील औद्योगिक वसाहत परिसरात वरद फर्टिलायझर या सेंद्रीय खत तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा मारुन तब्बल ९० लाख रुपये किमतीचे साडेचारशे मेट्रिक टन बनावट सेंद्रीय खत जप्त केले. दोन्ही कारवाईत तब्बल दीड कोटींचा बोगस खताचा साठा जप्त केला. दोन्ही बनावट कारखाने कोणाचे हे कृषी विभागाला माहित असताना अद्यापही त्या मालकांविरुध्द तक्रार करण्यात आलेली नाही, हे विशेष.

मालकांच्या नावानिशी फिर्याद हवीखताच्या दोन्ही बनावट कारखान्यांविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याला दोन दिवस होऊन गेले आहेत. मात्र, अद्यापही चंदनझिरा पोलिसांनी तपासाला गती दिली नाही. कृषी विभागाने  मालकांच्या नावानिशी फिर्याद देणे गरजेचे होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे, पण तसे झाले नाही. त्यामुळे पुन्हा कृषी विभागाकडे पत्रव्यवहार करुन संबंधितांची माहिती घेण्यात येईल. त्यानंतर या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीagricultureशेतीJalanaजालना