शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कार-दुचाकी अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:23 IST

भरधाव कार-दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : भरधाव कार-दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा येथे घडली.गोरख विठ्ठल नागरे (५४ रा. संगम जळगाव ता. गेवराई) असे मयताचे नाव आहे. गोरख नागरे व त्यांच्या पत्नी नयना नागरे (५०) हे दोघे सोमवारी सकाळी गेवराई येथून दुचाकीवरून अंबड तालुक्यातील दोदडगाव येथील सासरवाडीला जात होते. औरंगाबाद- सोलापूर महामार्गावरील दोदडगावच्या फाट्यावर औरंगाबादहून बीडकडे भरधाव जाणाऱ्या कारने (क्र.एम.एच.४३- एक्स. ३०९२) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील नागरे दाम्पत्य जखमी झाले.अपघातात गोरख नागरे यांच्या डोक्याला, पायाला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी असलेले बळीराम मुंडे व इतर तरुणांनी त्यांना तात्काळ पाचोड येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेले. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, मयताच्या पार्थिवावर गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.गेल्या चारवर्षापासून या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु, रस्ता ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर खराब होता. त्यावेळी अनेक छोट्या-मोठ्या अपघातामध्ये अनेकांचा बळीही गेला होता. तर अनेक जण जायबंदी झाले होते.औरंगाबाद- सोलापूर हा महामार्ग चौपदरी व्हावा, म्हणून गेल्या पाच ते सात वर्षापासून काम सुरू आहे. हे काम कधी निधीअभावी तर कधी जमीन संपादनावरून अडविण्यात आले होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूcarकार