शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

कार-दुचाकी अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:23 IST

भरधाव कार-दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : भरधाव कार-दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा येथे घडली.गोरख विठ्ठल नागरे (५४ रा. संगम जळगाव ता. गेवराई) असे मयताचे नाव आहे. गोरख नागरे व त्यांच्या पत्नी नयना नागरे (५०) हे दोघे सोमवारी सकाळी गेवराई येथून दुचाकीवरून अंबड तालुक्यातील दोदडगाव येथील सासरवाडीला जात होते. औरंगाबाद- सोलापूर महामार्गावरील दोदडगावच्या फाट्यावर औरंगाबादहून बीडकडे भरधाव जाणाऱ्या कारने (क्र.एम.एच.४३- एक्स. ३०९२) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील नागरे दाम्पत्य जखमी झाले.अपघातात गोरख नागरे यांच्या डोक्याला, पायाला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी असलेले बळीराम मुंडे व इतर तरुणांनी त्यांना तात्काळ पाचोड येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेले. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, मयताच्या पार्थिवावर गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.गेल्या चारवर्षापासून या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु, रस्ता ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर खराब होता. त्यावेळी अनेक छोट्या-मोठ्या अपघातामध्ये अनेकांचा बळीही गेला होता. तर अनेक जण जायबंदी झाले होते.औरंगाबाद- सोलापूर हा महामार्ग चौपदरी व्हावा, म्हणून गेल्या पाच ते सात वर्षापासून काम सुरू आहे. हे काम कधी निधीअभावी तर कधी जमीन संपादनावरून अडविण्यात आले होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूcarकार