शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

२ दिवसांत विशेष अधिवेशन बोलवा; मनोज जरांगे पुन्हा बसले उपोषणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 13:48 IST

सध्या सरकारसोबत नेटवर्क जाम आहे. एकमेकांना फोनच होत नाहीत. आम्हाला आता फक्त अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर आणि त्याची अंमलबजावणी हवी आहे.

मुंबई - नवी मुंबईतील वाशी येऊन शासकीय अध्यादेश घेऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे माघारी फिरले होते. आपल्या मुंबईतील आझाद मैदानावरील उपोषणाची त्यांनी येथूनच सांगता करत विजयी जल्लोषही केला. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याचा आनंद सर्वांनी साजरा केला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वाशीत येऊन मनोज जरांगेंना ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडलं. मात्र, मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातून त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे. 

सध्या सरकारसोबत नेटवर्क जाम आहे. एकमेकांना फोनच होत नाहीत. आम्हाला आता फक्त अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर आणि त्याची अंमलबजावणी हवी आहे. या मागणीवर ठाम असून सरकारने उपोषणाची वेळ आणू नये, असे आवाहन जरांगे यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. त्याचवेळी, त्यांनी मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करा, अन्यथा पुन्हा १० फेब्रुवारीपासून उपोषण सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार, मनोज जरांगे यांनी आजपासून उपोषण सुरू केलं आहे. सरकारने दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलवून सगेसोयरे शब्दाच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करावे, अशी प्रमुख मागणीही त्यांनी यावेळी केली.

मुंबईतील आंदोलन वाशीच्या मार्केट किमिटीतून स्थगित केल्यानंतर जरांगे यांनी आपलं गाव गाठलं होतं. मात्र, त्यानंतर लगेच ते ४ दिवसांच्या दौऱ्यावर निघाले होते. कामोठे, नवी मुंबई चेंबूर आणि आळंदी येथेही त्यांचा मोठा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर, त्यांनी मुंबईत वकिलांसोबत बैठक घेऊन मराठा आंदोलकांसोबतही चर्चा केली. याचदरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी अध्यादेशा कायदा करा, अन्यथा १० फेब्रुवारीला उपोषण सुरू करणार असल्याचं म्हटलं होंत. त्यानुसार, आज गोदा पट्ट्यातील मराठा समाजाची बैठक घेऊन जरांगे यांनी आपलं उपोषण सुरू केलं आहे. 

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भातील बऱ्याच प्रक्रिया सरकारकडून बाकी आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी हे आमरण उपोषण असल्याचेही जरांगे-पाटील यांनी म्हटले. तसेच, आता एक इंचही आपण मागे हटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज अंतरवाली सराटी येथे हजारो मराठा बांधव जमले आहेत. राज्याच्या अनेक जिल्ह्यात जरांगे यांच्या उपोषणाला समर्तन देण्यासाठी एकत्र आले आहेत. यावेळी, काही मराठा बांधवांनी त्यांच्या उपोषणाला विरोध दर्शवला असून सरकारने मागणी पूर्ण करावी, असे म्हटले आहे. सातत्याने मनोज जरांगे यांच्यावर उपोषणाची वेळ येऊ देऊ नये, त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे, असे म्हणत काही मराठा बांधवांनी उपोषण न करण्याची विनंती जरांगे यांना केली आहे.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबई