शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

१० कोटींची तूर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:17 IST

जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रावर नोंदणी केलेल्या साडेआठ हजार शेतकऱ्यांपैकी ४ हजार ९ शेतक-यांची १० कोटी ४७ लाख ८१ हजार रूपये किंमतीची ३७ हजार ७६६ क्विंटल तूर नाफेडने खरेदी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रावर नोंदणी केलेल्या साडेआठ हजार शेतकऱ्यांपैकी ४ हजार ९ शेतक-यांची १० कोटी ४७ लाख ८१ हजार रूपये किंमतीची ३७ हजार ७६६ क्विंटल तूर नाफेडने खरेदी केली आहे.४ हजार शेतक-यांची तूर खरेदी अद्यापही बाकी असल्याचे चित्र आहे. १५ मे पर्यंतच तूर खरेदी करण्यात येणार असल्याने हमीभाव केंद्रावर शेतक-यांची लगबग दिसून येत आहे.नाफेडने तूर खरेदी बाबत जाचक अटी लावूनही जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रावर तब्बल साडेआठ हजार शेतक-यांनी त्या - त्या ठिकाणच्या केंद्रावर आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र गेल्या वर्षी खरेदी केलेली १ लाख मेट्रीक टना पेक्षा जास्त तूर वेअर हाऊसमध्ये पडून आहे. जागाच नसल्याने खरेदी केलेली तूर ठेवावी कोठे यामुळे जाणिवपूर्वक आधीपासूनच तूर संथगतीने खरेदी केल्याने शेतक-यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी आत्तापर्यंत फक्त ४ हजार ९ शेतक-याची तूर खरेदी करण्यात आली आहे.उर्वरीत साडेचार हजार शेतक-यांची तूर खरेदी बाकी आहे. त्यातच नाफेडने अचानक १८ एप्रिल रोजी तूर खरेदी बंद केल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. परिणामी शेतक-यांना हमीभावापेंक्षा १५०० रूपये कमी दराने तूर विकण्याची वेळ आल्याने शेतक-यांनी संताप होता. तब्बल आठवडा भर तूर खरेदी बंद राहिल्याने आपली तूर खरेदी होईल की, नाही याची चिंता शेतक-यांना सतावत होती. शेतक-यांचा वाढता दबाव बघून नाफेडने बंद केलेली खरेदी २७ एप्रिल पासून पुन्हा सुरू केली. मात्र १५ मे पर्यतच खरेदी करण्याचे निर्देश नाफेडने दिले आहेत. यामुळे नोंदणी केलेल्या शेतक-यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यातच कडक उन्ह, लग्नसराई आणि आठवड्याच्या आलेल्या सुट्या यामुळे देखील तूर खरेदी केंद्रावर शेतकरी गर्दी करू लागले आहेत. तूर खरेदीला मुदत वाढ देण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे. एकूणच कांद्या प्रमाणेच तूरीनेही शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणले.जालना : ८ कोटी शेतक-यांच्या खात्यातनाफेडने खरेदी केलेल्या १० कोटी ४७ लाख रूपयांच तूर खरेदी केलेली आहे. ३० एप्रिल पर्यत शेतक-यांच्या बँक खात्यात ८ कोटी रूपये जमा करण्यात आले असल्याची माहिती आहे. उर्वरीत उर्वरीत २ कोटी ४७ लाख रूपये नाफेडकडून येणे बाकी आहे. तसेच जिल्ह्यातील जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन या केंद्रावर ३३५ शेतक-याकडून ४ हजार २८० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. मात्र त्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड