शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

१० कोटींची तूर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:17 IST

जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रावर नोंदणी केलेल्या साडेआठ हजार शेतकऱ्यांपैकी ४ हजार ९ शेतक-यांची १० कोटी ४७ लाख ८१ हजार रूपये किंमतीची ३७ हजार ७६६ क्विंटल तूर नाफेडने खरेदी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रावर नोंदणी केलेल्या साडेआठ हजार शेतकऱ्यांपैकी ४ हजार ९ शेतक-यांची १० कोटी ४७ लाख ८१ हजार रूपये किंमतीची ३७ हजार ७६६ क्विंटल तूर नाफेडने खरेदी केली आहे.४ हजार शेतक-यांची तूर खरेदी अद्यापही बाकी असल्याचे चित्र आहे. १५ मे पर्यंतच तूर खरेदी करण्यात येणार असल्याने हमीभाव केंद्रावर शेतक-यांची लगबग दिसून येत आहे.नाफेडने तूर खरेदी बाबत जाचक अटी लावूनही जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रावर तब्बल साडेआठ हजार शेतक-यांनी त्या - त्या ठिकाणच्या केंद्रावर आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र गेल्या वर्षी खरेदी केलेली १ लाख मेट्रीक टना पेक्षा जास्त तूर वेअर हाऊसमध्ये पडून आहे. जागाच नसल्याने खरेदी केलेली तूर ठेवावी कोठे यामुळे जाणिवपूर्वक आधीपासूनच तूर संथगतीने खरेदी केल्याने शेतक-यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी आत्तापर्यंत फक्त ४ हजार ९ शेतक-याची तूर खरेदी करण्यात आली आहे.उर्वरीत साडेचार हजार शेतक-यांची तूर खरेदी बाकी आहे. त्यातच नाफेडने अचानक १८ एप्रिल रोजी तूर खरेदी बंद केल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. परिणामी शेतक-यांना हमीभावापेंक्षा १५०० रूपये कमी दराने तूर विकण्याची वेळ आल्याने शेतक-यांनी संताप होता. तब्बल आठवडा भर तूर खरेदी बंद राहिल्याने आपली तूर खरेदी होईल की, नाही याची चिंता शेतक-यांना सतावत होती. शेतक-यांचा वाढता दबाव बघून नाफेडने बंद केलेली खरेदी २७ एप्रिल पासून पुन्हा सुरू केली. मात्र १५ मे पर्यतच खरेदी करण्याचे निर्देश नाफेडने दिले आहेत. यामुळे नोंदणी केलेल्या शेतक-यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यातच कडक उन्ह, लग्नसराई आणि आठवड्याच्या आलेल्या सुट्या यामुळे देखील तूर खरेदी केंद्रावर शेतकरी गर्दी करू लागले आहेत. तूर खरेदीला मुदत वाढ देण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे. एकूणच कांद्या प्रमाणेच तूरीनेही शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणले.जालना : ८ कोटी शेतक-यांच्या खात्यातनाफेडने खरेदी केलेल्या १० कोटी ४७ लाख रूपयांच तूर खरेदी केलेली आहे. ३० एप्रिल पर्यत शेतक-यांच्या बँक खात्यात ८ कोटी रूपये जमा करण्यात आले असल्याची माहिती आहे. उर्वरीत उर्वरीत २ कोटी ४७ लाख रूपये नाफेडकडून येणे बाकी आहे. तसेच जिल्ह्यातील जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन या केंद्रावर ३३५ शेतक-याकडून ४ हजार २८० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. मात्र त्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड