शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
2
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
3
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
4
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
5
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
6
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
7
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
8
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
9
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
10
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
11
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
12
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
13
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
14
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
15
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
16
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
17
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
18
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
19
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
20
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
Daily Top 2Weekly Top 5

कसुरा नदीत बस कोसळली : २५ प्रवासी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:35 IST

परतूर : चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने २५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस पाण्यात कोसळल्याची घटना परतूर तालुक्यातील श्रीष्टी गावाजवळील ...

परतूर : चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने २५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस पाण्यात कोसळल्याची घटना परतूर तालुक्यातील श्रीष्टी गावाजवळील कसुरा नदीवर गुरुवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी धाव घेऊन २५ प्रवाशांना वाचविले आहे.

परतूर तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्या-नाल्यांना पूर आलेला आहे. यातच गुरुवारी रात्री परतूर आगाराची (एमएच.१४.बीटी.२२८०) ही बस परतूरहून २३ प्रवासी घेऊन आष्टीकडे जात होती. या बसमध्ये दोन लहान मुलांसह २३ प्रवासी व चालक, वाहक असे एकूण २५ प्रवासी होते. श्रीष्टी गावाजवळ कसुरा प्रकल्प आहे. सध्या या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. कसुरा नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी जात आहे. अशात बसचालकाने बस पाण्यातून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा अंदाज न आल्याने बस नदीपात्रात कोसळली. ही बाब कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन बसच्या काचा फोडून सर्व प्रवाशांना खिडकीतून बाहेर काढले.

यांनी वाचविला प्रवाशांचा जीव

बस पाण्यात पडल्याचे कळताच, सरपंच प्रमोद अंभोरे, कल्याण अंभोरे, सोमेश्वर नवल, योगेश नवल, भरत मुळे, गणेश नवल, सर्जेराव अंभोरे, पवन सरकटे, बालू तिखे, महादेव अंभोरे, जगन्नाथ अंभोरे आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढले. घटनास्थळी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, शिवसेना जिल्हा उपप्रमुख बाबासाहेब तेलगड, सरपंच शत्रुघ्न कणसे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार रूपा चित्रक, वैद्यकीय अधीक्षक बी. आर. नवल, आगारप्रमुख दिगंबर जाधव, पोनि. श्यामसुंदर कौठाळे यांची उपस्थिती होती.

चालक-वाहक फरार

संतप्त प्रवासी व ग्रामस्थांनी चालक-वाहकाचा शोध घेतला, मात्र ते दोघे घटनास्थळाहून पसार झाले होते. पाण्याचा प्रवाह वाढलेला असतानाही बस पाण्यात का घातली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.