शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

अनुदानाअभावी ८४० घरांच्या कामांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 00:26 IST

जालना जिल्ह्यात रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ८४० लाभार्थ्यांना मागील तीन वर्षांपासून अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गावातील दारिद्य रेषेखालील गरजू वंचितांना राहण्यासाठी हक्काचे घरकुल मिळावे यासाठी सरकारने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजनांच्या माध्यमातून लाखो रुपयांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतात. निवड झालेल्या लाभार्थ्यांना टप्प्या- टप्प्याने अनुदानाची राशी वितरित केली जाते. जालना जिल्ह्यात रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ८४० लाभार्थ्यांना मागील तीन वर्षांपासून अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे सध्यातरी घरकुल बांधकामाला ब्रेक लागल्याचे चित्र आहे.राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने रमाई घरकुल आवास योजना राबविली जाते. अनुसूचित जाती प्रवर्गातील गरजू वंचितांना राहण्यासाठी हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना १ लाख ३० हजाराचे अनुदान दिले जाते. सन २०१६-१७, १७-१८, १८-१९ या तीन वर्षांत जालना जिल्ह्यात ६६३४ घरकुलांना मंजूरी दिली होती. त्यातील निवड झालेल्या ८४० लाभार्थ्यांना अद्यापही अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे घरकुलाच्या कामांना ब्रेकच लागल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.घरकुल मंजूर झालेले लाभार्थी दुरवरून येऊन पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या पायऱ्या झिजवून निराश होवून घराची वाट धरतात.घर बांधकाम करण्याची योग्य काळ-वेळ असताना पैशा अभावी घरकुलाचे बांधकाम बंद ठेवण्याशिवाय कोणताही पर्यायच लाभार्थ्यांसमोर उरलेला नाही. अनुदान केव्हा जमा होणार याची प्रतीक्षा लाभार्थी करताना दिसत आहे.५ ब्रास वाळू देण्यास तहसीलदार उदासीनज्या लाभार्थ्यांना सरकारतर्फे घरकुल देण्यात येत आहे. त्या लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याचे सरकारचे आदेश आहे. परंतु, जालना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील तहसिल कार्यालयांकडून लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्यात येत नाही. याबाबत बिडिओंनी तहसिलदारांना पत्र देखील दिले आहे. परंतु, तहसिल कार्यालयातर्फे वाळू दिली जात नाही. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.निवड झालेल्या पात्र लाभार्थांनी करारनामे केले असून, अद्यापही घरकुल लाभार्थ्यांना अनुदानाचा हप्ताच मिळाला नसल्याची ओरड आहे. समाजातील इतर मागास प्रवर्गासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत क्रमावर पध्दतीने लाभार्थ्यांची निवड केली जात असल्याने अत्यंत गरजू व वंचित लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून दुरावत असल्याचे चित्र आहे.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मागील चार वर्षात ७ हजार ९३७ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी ४२५ लाभार्थ्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाHomeघरfundsनिधी