शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

अन् दोघांनाही अश्रू अनावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 01:26 IST

वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून मिळालेले बक्षीस पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या पाल्यांना देण्याची घोषणा घनसावंगी तालुक्यातील मत्स्योदरी विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून मिळालेले बक्षीस पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या पाल्यांना देण्याची घोषणा घनसावंगी तालुक्यातील मत्स्योदरी विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली. दरम्यान, घोषणा करताच ‘त्या’ दोघांना अश्रू अनावर झाले.सोमवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित जनार्दनमामा वादविवाद स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड येथील विद्यार्थी गायत्री तुकाराम रक्ताटे व ओंकार सारंगधर काळे या दोघांना बक्षीस म्हणून टॅब देण्यात आले. या दोघांनी हे बक्षीस शहीद झालेल्या जवानांच्या पाल्यांना देण्याची घोषणा केली. दरम्यान, अध्यक्ष खोतकर बोलत असताना या दोन्ही विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले . यावेळी सभागृहातील प्रत्येक जण भावूक झाला. या दोन्ही विद्यार्थ्यांना शिक्षक दीपक आघाव यांनी मार्गदर्शन केले.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सदस्यांचा रोषजालना : पाणी उपलब्ध असताना टॅकरचा प्रस्ताव पाठवल्या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी भोकरदन तालुक्यातील पोखरी येथील ग्रामसेवकास निलंबित केले. या प्रकरणावरून सभेत चांगलाच गोंधळ झाला.भोकरदन तालुक्यातील पोखरी येथील ग्रामसेविका ए. ई. सोनुने यांनी गावात पाणी उपलब्ध असतांनाही टॅकरचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला होता. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी कोणतीही चौकशी न करता त्यांना निलंबित केले. पाणी उपलब्ध असताना ग्रामसेवकाने टॅकरचे प्रस्ताव पाठवणे हे चुकीचे नसून, त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज नसल्याचे सदस्य म्हणाले. या कारवाईमुळे ग्रामसेवक टँकरचे प्रस्ताव पाठवत नसून, मुख्य कार्यकारी अधिका-यांनी निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करत सभेत गोंधळ घातला.दरम्यान, या कारवाईनंतर तिस-याच दिवशी या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तेव्हा गावातील पाणी गायब कसे झाले, असा सवाल सदस्य शालिकराम म्हस्के यांनी उपस्थित केला. तेवढ्यात सदस्य विठ्ठल चिंचपुरे म्हणाले की, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा या अकार्यक्षम अधिकारी आहेत. यावरुन सदस्य व अध्यक्षांमध्ये चांगलाच वाद झाला. यावर उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, मी प्रत्यक्ष पाहणी करुन चौकशी करणार आहेत. त्यानंतरच हे निलंबन मागे घेण्यात येईल. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या मुद्यावरून भाजपचे सदस्य अवधूत खडके यांनी सभात्याग केला. यावेळी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा आदींची उपस्थिती होती.जिल्हा परिषदेतर्फेही मदतपुलवामा येथे शहीद झालेले जवान नितीन शिवाजी राठोड आणि संजय राजपूत यांच्या कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या सदस्यांतर्फे महिन्याभराचा तर अधिकारी व कर्मचा-यांच्या वतीने दिवसभराचा पगार देण्यात येणार असल्याचे जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले आहेत. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. आता आपल्याला त्यांच्या कुटुंबियांना मदत करायला पाहिजे. यासाठी जिल्हा परिषदेचे सर्वच सदस्य महिन्याभराचा पगार शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार आहे. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, प्रशासनाच्या वतीनेही शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यात येईल. अधिकारी व कर्मचारी एक दिवसाचा पगार शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार आहे.

टॅग्स :MartyrशहीदSchoolशाळाTerror Attackदहशतवादी हल्ला