शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पाय घसरून विहिरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह काढला बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:47 IST

पाय घसरून विहिरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह रविवारी पहाटे पर्यंत मोटारीद्वारे पाण्याचा उपसा करून बाहेर काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : पाय घसरून विहिरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह रविवारी पहाटे पर्यंत मोटारीद्वारे पाण्याचा उपसा करून बाहेर काढण्यात आला. ही घटना भोकरदन तालुक्यातील चांधई टेपली शिवारातील शनिवारी दुपारी घडली होती.चांधई टेपली येथील दिलीप सीताराम पवार (२३) हा युवक शनिवारी दुपारी शेतात गेला होता. विहिरीजवळ गेल्यानंतर पाय घसरल्याने तो आतमध्ये पडला. आसपासच्या नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर विहिरीकडे धाव घेऊन दिलीपला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, विहिरीत ४० फुटाच्यावर पाणी असल्याने तो सापडला नाही. यावेळी गावातील नागरिकांनी, नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच राजूर पोलीस चौकीचे सहायक फौजदार शंकर काटकर, जमादार विष्णू बुनगे, होमगार्ड सुधाकर टेपले, परमेश्वर टेपले यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध कार्य सुरू केले. परंतु विहिरीतील पाण्यामुळे दिलीपचा शोध लागला नव्हता.त्यानंतर विहिरीतील पाणी उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांनी विद्युत पंप व इंजिनच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसा सुरू केला. रविवारी पहाटेपर्यंत पाण्याचा उपसा केल्यानंतर दिलीपचा मृतदेह आढळून आला. राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऊत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर रविवारी दुपारी चांधई टेपली येथे मयताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत युवकाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूWaterपाणीdrowningपाण्यात बुडणे