शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कुणी रक्त देता का रक्त..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:39 IST

उन्हाळ्यात रक्तदान शिबिरांची कमी झालेली संख्या व गैरसमजुतीमुळे रक्तदानाचा टक्का घसरतो. या वर्षी अशीच स्थिती निर्माण झाल्याने शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी अडचणीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन रक्तदान केल्यास रक्ताची टंचाई कधीच पडणार नाही, हे माहीत असतानाही फार कमी लोक स्वत:हून समोर येतात. यातच उन्हाळ्यात रक्तदान शिबिरांची कमी झालेली संख्या व गैरसमजुतीमुळे रक्तदानाचा टक्का घसरतो. या वर्षी अशीच स्थिती निर्माण झाल्याने शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी अडचणीत आहेत.सध्याच्या स्थितीत जिल्हा रुग्णालयात ५३ पिशव्या रक्त उपलब्ध आहेत. या रुग्णालयातून दररोज ७ ते ८ रक्तपिशव्यांची मागणी असते. यामुळे दहा दिवस पुरेल एवढाच हा साठा असल्याने ‘रक्त देता का रक्त’ अशी आर्त हाक या रक्तपेढींने दिली आहे.सामान्य रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात. घाटीत अपघाताचे रुग्ण दाखल होण्याचे प्रमाणही अधिक आहे. दररोज ६० ते ७० प्रसूती होतात. प्रसूती किंवा सिझेरियन शस्त्रक्रियेच्या वेळी विविध शस्त्रक्रियांसाठी आणि थॅलेसेमिया, अ‍ॅनेमियासह इतर आजारांसाठी रक्त, रक्तघटकांची आवश्यकता असते. घाटीतील विभागीय रक्तपेढीमध्ये दररोज जवळपास ७ ते ८ पिशव्या रक्त आणि रक्तघटकांची मागणी असते; परंतु सध्या ५३ पिशव्याच रक्तसाठा उपलब्ध असून हे रक्त दहा दिवस पुरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीHealthआरोग्यSocialसामाजिक