शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्यांच्या गळ्यात सावकारकीचा फास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 00:21 IST

जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दाखल तक्रारीच्या सुनावणीनंतर जिल्ह्यातील ४८ सावकारांकडील २७ हेक्टर ८३ आर. जमीन शेतकऱ्यांना परत मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दाखल तक्रारीच्या सुनावणीनंतर जिल्ह्यातील ४८ सावकारांकडील २७ हेक्टर ८३ आर. जमीन शेतकऱ्यांना परत मिळाली आहे. महाराष्ट्र सावकारकी अधिनियम २०१४ लागू झाल्यापासून सावकारकीविरूद्ध आजवर तब्बल ३२४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील २१५ प्रकरणात कारवाई पूर्ण झाली आहे.शासनाने दिलेले खरीप, रबी हंगामातील कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न करणा-या राष्ट्रीयकृत बँका शेतक-यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देत नाहीत. शेतातील कामे, मुला-मुलींचे शिक्षण असो किंवा दवाखान्याचा खर्च असो विविध कामासाठी लागणारा पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकरी सावकाराच्या दारात जातो. मात्र, हे सावकार दिलेल्या कर्जावर भरमसाठ कर्ज लावून शेतक-यांची आर्थिक पिळवणूक करीत असून, शेतजमिनीची लूटही करीत आहेत. अशा सावकारांना कंटाळलेल्या ३२४ शेतक-यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे महाराष्ट्र सावकारकी अधिनयम २०१४ अंतर्गत तक्रारी नोंदविल्या होत्या. पैकी २१६ प्रकरणांची कारवाई पूर्ण झाली आहे. यातील १६८ प्रकरणात तथ्य नसल्याचा अहवाल चौकशीनंतर समोर आला. तर ४८ प्रकरणात सावकारकी सुरू असल्याचे समोर आले आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात झालेल्या सुनावणीनंतर आजवर २७ हेक्टर ८३ आर जमीन संबंधित सावकाराकडून शेतक-यांना परत करण्यात आली आहे. तर १०८ प्रकरणात तालुकास्तरावर चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सावकारकीला लगाम लावण्यासाठी दाखल होणा-या तक्रारींचा वेळेत निपटारा व्हावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.तक्रार : पोलीस ठाण्यात दाखल ८ गुन्ह्यांत १३ सावकार आरोपीजिल्हा उपनिबंधक कार्यालयात झालेल्या सुनावणीनंतर दोषी असलेल्या १३ सावकारांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, तालुकास्तरावर प्रलंबीत असलेली प्रकरणेही तातडीने मार्गी लावून अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अहवालानंतर सुनावणी घेऊन ही प्रकरणे निकाली काढली जाणार असल्याचे सांगण्यात आले.सावकारकीसाठी अर्ज सुरूचपरवाना घेऊन सावकारकी करणाºयांची संख्याही जिल्ह्यात मोठी आहे. प्रत्येक वर्षी परवाना नूतनीकरण करण्यासाठी सावकारांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गर्दी होते. विशेषत: जालना शहरासह तालुक्यात सर्वाधिक परवानाधारक सावकार आहेत.तक्रारीसाठी पुढे येण्याची गरजदुष्काळाने होरपळणा-या शेतक-यांची सावकार राजरोस लूट करीत आहेत. मात्र, अनेकांकडे शेतक-यांच्या जमिनी, घरे गहाण आहेत. त्यामुळे भीतीपोटी अनेक शेतकरी, मजूर तक्रारी करत नाहीत. अशा पीडितांनी सावकारकीविरूध्द तक्रारी नोंदविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRegistrarकुलसचिव