शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

शेतकऱ्यांच्या गळ्यात सावकारकीचा फास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 00:21 IST

जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दाखल तक्रारीच्या सुनावणीनंतर जिल्ह्यातील ४८ सावकारांकडील २७ हेक्टर ८३ आर. जमीन शेतकऱ्यांना परत मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दाखल तक्रारीच्या सुनावणीनंतर जिल्ह्यातील ४८ सावकारांकडील २७ हेक्टर ८३ आर. जमीन शेतकऱ्यांना परत मिळाली आहे. महाराष्ट्र सावकारकी अधिनियम २०१४ लागू झाल्यापासून सावकारकीविरूद्ध आजवर तब्बल ३२४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील २१५ प्रकरणात कारवाई पूर्ण झाली आहे.शासनाने दिलेले खरीप, रबी हंगामातील कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न करणा-या राष्ट्रीयकृत बँका शेतक-यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देत नाहीत. शेतातील कामे, मुला-मुलींचे शिक्षण असो किंवा दवाखान्याचा खर्च असो विविध कामासाठी लागणारा पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकरी सावकाराच्या दारात जातो. मात्र, हे सावकार दिलेल्या कर्जावर भरमसाठ कर्ज लावून शेतक-यांची आर्थिक पिळवणूक करीत असून, शेतजमिनीची लूटही करीत आहेत. अशा सावकारांना कंटाळलेल्या ३२४ शेतक-यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे महाराष्ट्र सावकारकी अधिनयम २०१४ अंतर्गत तक्रारी नोंदविल्या होत्या. पैकी २१६ प्रकरणांची कारवाई पूर्ण झाली आहे. यातील १६८ प्रकरणात तथ्य नसल्याचा अहवाल चौकशीनंतर समोर आला. तर ४८ प्रकरणात सावकारकी सुरू असल्याचे समोर आले आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात झालेल्या सुनावणीनंतर आजवर २७ हेक्टर ८३ आर जमीन संबंधित सावकाराकडून शेतक-यांना परत करण्यात आली आहे. तर १०८ प्रकरणात तालुकास्तरावर चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सावकारकीला लगाम लावण्यासाठी दाखल होणा-या तक्रारींचा वेळेत निपटारा व्हावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.तक्रार : पोलीस ठाण्यात दाखल ८ गुन्ह्यांत १३ सावकार आरोपीजिल्हा उपनिबंधक कार्यालयात झालेल्या सुनावणीनंतर दोषी असलेल्या १३ सावकारांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, तालुकास्तरावर प्रलंबीत असलेली प्रकरणेही तातडीने मार्गी लावून अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अहवालानंतर सुनावणी घेऊन ही प्रकरणे निकाली काढली जाणार असल्याचे सांगण्यात आले.सावकारकीसाठी अर्ज सुरूचपरवाना घेऊन सावकारकी करणाºयांची संख्याही जिल्ह्यात मोठी आहे. प्रत्येक वर्षी परवाना नूतनीकरण करण्यासाठी सावकारांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गर्दी होते. विशेषत: जालना शहरासह तालुक्यात सर्वाधिक परवानाधारक सावकार आहेत.तक्रारीसाठी पुढे येण्याची गरजदुष्काळाने होरपळणा-या शेतक-यांची सावकार राजरोस लूट करीत आहेत. मात्र, अनेकांकडे शेतक-यांच्या जमिनी, घरे गहाण आहेत. त्यामुळे भीतीपोटी अनेक शेतकरी, मजूर तक्रारी करत नाहीत. अशा पीडितांनी सावकारकीविरूध्द तक्रारी नोंदविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRegistrarकुलसचिव