शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बीअर कंपन्यांना पाणी; कामगार तहानलेलेच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:47 IST

शेंद्रा एमआयडीसीतून येणारे पाणी जालन्यात अत्यल्प देण्यात येत असून, बीयरच्या कंपन्यांना मात्र, ऐन दुष्काळातही मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना औद्योगिक वसहातीत पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. एकीकडे शेंद्रा एमआयडीसीतून येणारे पाणी जालन्यात अत्यल्प देण्यात येत असून, बीयरच्या कंपन्यांना मात्र, ऐन दुष्काळातही मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज जालन्यातील स्टील उद्योग तर गेल्या सहा महिन्यांपासून टँकरच्याच पाण्यावर अवलंबून आहे. तर जालना एमआयडीसीला दररोज एक ते दीड एमएलडी एवढेही पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे.जालन्यातील उद्योग, व्यवसायामुळे दुष्काळात अनेकांना रोजगाराची संधी मिळत आहे. चंदनझिरा भागात असलेल्या कामगार वस्तीत आता किरायाने घर मिळणे मुश्किल झाले आहे. तर दुसरीकडे आठ ते दहा तास काम राबणाऱ्या कामगारांना एमआयडीसीकडून तहान भागवण्यासाठी लागणारे पाण्ीही पुरवले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.आज जालना शहरात जवळपास लहानमोठे मिळून ३०० पेक्षा अधिक उद्योग आहेत. यात जवळपास दोन हजारपेक्षा अधिक दररोज आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी जातात. परंतु पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने अनेकजण हे घरूनच पाण्याची बाटली सोबत आणतात. परंतु कडक उन्हामुळे सोबत आणलेले पाणी पिण्यायोग्य राहत नाही.जालना एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी ३०० कोटी रूपयांची योजना मंजूर झाली होती. परंतु ती अद्यापही कागदावरच आहे. त्यामुळे शेंद्रा एमआयडीसीतून मिळणाऱ्या पाण्यावरच जालन्यातील उद्योगांना अवंलबून राहावे लागत आहे.त्यासाठी एमआयडीसीच्या औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयाशी संपर्क साधूनही काहीच फरक पडला नसल्याचे उद्योजकांनी सांगितले.बीअर कंपन्यांना मुबलक पाणीजालन्यातील कामगारांना पिण्यासाठी हवे असलेला पाणीपुरवठा होत नाही, तर दुसरीकडे चिकलठाणा आणि वाळूज येथील बीअरचे उत्पादन करणा-या कारखान्यांना मात्र, अद्याप पाणी कपातीचा फटका बसला नाही. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे. आज जालन्यातील उद्योजकांना दररोज किमान एक हजार रूपयांचे जारचे पाणी विकत घेऊन ते कामगारांना पिण्यासाठी पुरवावे लागत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईMIDCएमआयडीसी