शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

औरंगाबादेत पानतावणे संशोधन केंद्र स्थापन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:56 AM

येथे दोन दिवस सुरू असलेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाची रविवारी रात्री सांगता झाली. यात एकूण १० ठराव मंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देसाहित्य संमेलनात ठरावअस्मितादर्श साहित्य संमेलनाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कजालना (पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे साहित्यनगरी) : येथे दोन दिवस सुरू असलेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाची रविवारी रात्री सांगता झाली. यात एकूण १० ठराव मंजूर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने औरंगाबाद येथे पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या ठरावाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात संमती देऊन स्वागत केले.मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात ३५ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन पार पडले. समारोप कार्यक्रमास आ. राजेश टोपे, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवी तूपकर, प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर, सुधाकर गायकवाड, संमेलनाचे अध्यक्ष डी.बी. जगत्पुरीया, स्वागताध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, निवेदीता पानतावने, राम गायकवाड, प्रा. विजय कुमठेकर यांच्यासह संयोजन समितीचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी राजेश टोपे, रवी तूपकर तसेच लुलेकर आणि गायकवाड यांनी मार्गदर्शन करून अस्मितादर्श साहित्य संमेलनातून समाजाला एक नवीन दिशा मिळते. साहित्यातून समाजाचे खरे प्रतिबिंब चित्रित होते असे सांगण्यात आले. या संमेलनात विविध ठराव संमत करण्यात आले आहे.या ठरावाचे वाचन साहित्य संमेलनाचे सचिव राम गायकवाड यांनी केले.या ठरावांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र शासनातर्फे पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे साहित्य संशोधन केंद्राची स्थापना औरंगाबादेत व्हावी, भारतीय संविधानाचा समावेश शालेय ते उच्च शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमात करण्यात व्हावा, अस्मितादर्श साहित्य संमेलनास शासकीय अनुदान देण्यात यावे, अजिंठा लेणी परिसरात होवू घातलेल्या पाली विद्यापीठाची स्थापना तातडीने करण्यात यावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व यूपीएससीच्या परीक्षा अभ्यासक्रमामध्ये पाली भाषेचा पुनश्च समावेश करावा, समतेची शिकवण देणाऱ्या बौद्ध संस्कृती व साहित्याचे सांस्कृतिक वारसा म्हणून संवर्धन व जतन शासनाने करावे, प्रसारमाध्यमे, साहित्यिक, पत्रकार, अल्पसंख्यांक, महिला, विचारवंत यांच्यावर होणारे हल्ले आणि अत्याचाराचा निषेध यावेळी करण्यात आला. संविधानाचा अपमान करणा-या प्रवृत्ती व संघटनांचा यावेळी निषेध नोंदविला. मराठवाडा हा कायमस्वरूपी दुष्काळवाडा बनत चालला आहे. तरी शासनाने दुष्काळ निवारणार्थ कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळावे यावरही चर्चा करण्यात येऊन ठराव मंजूर करण्यात आला.ग्रंथ विक्रीला चांगला प्रतिसादएकीकडे वाचन संस्कृती लोप पावत असल्याचे बोलले जात आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि लॅपटॉप दिसत आहे. अशाही स्थितीत जालना येथे दोन दिवस अस्मितादर्श साहित्यसंमेलनलनानिमित्त वेगवेगळ्या प्रकाशकांचे गं्रथ विक्रीची दालने उभारली होती. या दालनांमध्ये नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला.

टॅग्स :literatureसाहित्यAsmitadarsh Sahitya Sammelanअस्मितादर्श साहित्य संमेलन