शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पोलिसांच्या निर्देशांकडे बँकांची सर्रास डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:41 IST

जालाना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, नागरी सहकारी बँका आणि अन्य वित्तीय संस्था मिळून जवळपास १०४ पेक्षा अधिक आहेत.

ठळक मुद्देचोरट्यांकडून लक्ष्य : कोट्यवधी रूपये राम भरोसे, चोरट्यांचे फावते...

जालना : जालाना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, नागरी सहकारी बँका आणि अन्य वित्तीय संस्था मिळून जवळपास १०४ पेक्षा अधिक आहेत. त्यात सर्व मिळून अंदाजित तीन हजार कोटी रूपयांच्या ठेवी असून, रोजची उलाढाल ही काहीशे कोटी रूपयांमध्ये होते.एवढे सर्व व्यवहार होत असतांना अनेकजण आपल्या कष्टाचा पैसा हा सुरक्षीत राहावा म्हणून बँक, पतसंस्थांमध्ये ठेवताता. मात्र, या संस्थाच जर पैशांच्या सुरक्षेकडे एवढे दुर्लक्ष करत असतील तर मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. याचे ताजे उदाहरण म्हणजे जालन्यातील एसबीआय शाखेची तिजोरी फोडण्याचा झालेला प्रयत्न पुरेसा बोलका आहे.जालना शहर हे व्यापार आणि उद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे दररोजच कोट्यवधी रूपयांचे व्यवहार हे नित्याचेच आहेत. त्यातच हजारो कोटी रूपयांच्या ठेवी जालन्यातील जवळपास ३५ राष्ट्रीयकृत आणि ५७ सहकारी बँका, पगारदारांच्या पतसंस्थांमध्ये ठेवलेल्या आहेत. एकूणच हे पैसे ग्राहकांना बँकांमध्ये रांगांमध्ये उभे राहून काढण्यासाठी जाणारा वेळ कमी व्हावा म्हणून एटीएम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु हे एटीएमच लांबवून त्यातील रक्कम लांबविण्याचे प्रकार जालन्यातही घडले होते. परंतु एवढे सर्व होऊनही बँकांचे व्यवस्थापन हे सुरक्षेकडे कानाडोळा करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.जालना शहरातील गांधीचमन भागातील एसबीआय बँकेच्या शटरच्या कुलूपा तोडून एका चोरट्याने थेट बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्याला यश आले नाही. त्या तिजोरीत ५४ लाख रूपये होते, अशी माहिती बँक व्यवस्थापकाने पोलिसांना दिली. जर तिजोरी फोडण्यात चोरट्याला यश आले असते तर, मोठा अनर्थ ठरला असता असे बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूणच या प्रकारामुळे पोलिसही धास्तावले आहेत.

टॅग्स :JalanaजालनाBanking Sectorबँकिंग क्षेत्रatmएटीएमtheftचोरीPoliceपोलिस