शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

अवकाळीने जनावरांच्या चाऱ्याचे उभे केले नवे संकट; ज्वारीची धसकटाला फुटली विषारी पालवी

By महेश गायकवाड  | Updated: May 5, 2023 18:42 IST

पशुसंवर्धन विभागाने शेतकरी व पशुपालकांना आपल्या जनावरांना या ज्वारीच्या पालवीपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले आहे.

जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उन्हाळी ज्वारीची लागवड केली होती. नुकतीच या पिकांची काढणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या महिनाभरापासून सातत्याने अवकाळी पाऊस होत आहे. या पावसाच्या पाण्यामुळे ज्वारीच्या धसकटाला हिरवीगार पालवी फुटली आहे. ही पालवी जनावरांना आकर्षित करत आहे. परंतु, या पालवीमध्ये विषारी घटक निर्माण झाल्याने ते खाल्ल्यास जनावरांना किराळ लागून मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना ज्वारीच्या बाटुकापासून दूर ठेवण्याचे आवाहन पशुवैद्यकीय डॉक्टरांनी केले आहे.

रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता मुबलक होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उन्हाळी ज्वारीची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. उशिरा लागवड झालेल्या ज्वारीचे पीक काही ठिकाणी उभे आहे. तर काही ठिकाणचे पीक अवकाळी पावसामुळे आडवे झाले आहे. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या ज्वारीची काढणी करून शेत मोकळे केले नाही. अशा शेतातील ज्वारीच्या धसकटाला अवकाळी पावसामुळे उन्हाळ्यात पालवी फुटली आहे. परंतु, ही पालवी विषारी असून, जनावरांनी ती खाल्ल्यास विषबाधा म्हणजे किराळ लागून मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने शेतकरी व पशुपालकांना आपल्या जनावरांना या ज्वारीच्या पालवीपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले आहे.

जनावरे सोडू नयेत विषारी ज्वारीची पालवी खाल्ल्याने जनावरांना विषबाधा होऊन मृत्यू होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जनावरे पालवी फुटलेल्या ज्वारीच्या शेतात चरण्यासाठी सोडू नयेत.डॉ. एम.डी , कामटे, पशुवैद्यकीय अधिकारी, वाटूर

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीJalanaजालना