शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

परतीच्या पावसाने शहरातील सखल भागात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 01:00 IST

जिल्ह्याच्या विविध भागांत शनिवारी परतीच्या पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविल्याने सर्वसामान्यांना मोठ्या पावसाची अशा कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा वार्षिक सरासरीच्या ८० टक्क्यापर्यंत पाऊस झाला आहे. मात्र, कमी- अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे भोकरदन तालुका वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यातील प्रकल्पांची तहान कायम आहे. शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत शनिवारी परतीच्या पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविल्याने सर्वसामान्यांना मोठ्या पावसाची अशा कायम आहे.मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरीच्या साधारणत: ८० टक्क्यांपर्यंत जिल्ह्यात पाऊस झाला आहे. मात्र मोठे पाऊस न झाल्याने भोकरदन तालुका वगळता इतर तालुक्यातील प्रकल्पांची तहान कायम असून, अर्ध्याहून अधिक प्रकल्प कोरडेठाक आहेत. शनिवारी सायंकाळी तासभर जालना शहरासह परिसरात परतीच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. यातून वाट शोधताना नागरिकांना कसरत करावी लागली.परतूर शहरासह परिसरात शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. परतूर शहरासह अंबा, कावजवळा, आनंदवाडी, रोहिणा, एकरूखा, कोरेगाव, मापेगाव, शिंगोना, सोंयजना, पाडळी, राहीणा (बु.), बामणी, शेलवडा, वरफळ, चिंचोली, रायपूर, सिरसगाव इ. भागांत या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे सोयाबीन पिकाला मात्र फटका बसणार आहे.भोकरदन तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील शेतकरी सध्या सोयाबीन, मका या खरीप पिकाची सोंगणी करीत आहे. मात्र; दोन दिवसापासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील भोकरदन, पारध, वालसावगी, धावडा, केदारखेड, राजूर, आनवा, आव्हाना, सिपोरा बाजार, दानापूर, जळगाव सपकाळ, नळणी या भागांत पाऊस झाला.या पावसाचा खरीप पिकांना फटका बसला आहे. राजूर भागात झालेल्या पावसामुळे कपाशीला जीवदान मिळाले आहे. शिवाय रबी पिकांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या भागातील चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामुळे राजूरसह परिसरातील पंधरा गावांचा पाणी प्रश्न बिकट आहे. त्यामुळे पंधरा गावांतील नागरिकांना हिवाळ्यातच पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे. तसेच दाभाडी व परिसरातही पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आणखी मोठा पाऊस झाला तर रबी हंगामाला दिलासा मिळणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र, जलसाठे भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.वीज पडून बैलाचा मृत्यूवडोद तांगडा : भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील विठ्ठल रंगनाथ तांगडे हे शनिवारी दुपारी बैलगाडी घेऊन घराकडे येत होते. त्यावेळी अचानक वीज पडल्याने एका बैलाचा मृत्यू झाला. यात तांगडे यांचे जवळपास ४० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेने शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.अवजड वाहने चिखलात फसलीवालसावंगी : वालसावंगी- पारध रस्त्याच्या कडेला दोन वाहने चिखलात फसली होती. दोन्ही वाहने जवळजवळ फसल्याने या मार्गावरील वाहतूक तीन ते चार तास विस्कळीत झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ही वाहने रस्त्यावरच थांबल्याने या मार्गावरून येणा-या- जाणा-या नागरिकांसह शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

टॅग्स :RainपाऊसweatherहवामानNatureनिसर्गwater shortageपाणीकपात