शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

परतीच्या पावसाने शहरातील सखल भागात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 01:00 IST

जिल्ह्याच्या विविध भागांत शनिवारी परतीच्या पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविल्याने सर्वसामान्यांना मोठ्या पावसाची अशा कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा वार्षिक सरासरीच्या ८० टक्क्यापर्यंत पाऊस झाला आहे. मात्र, कमी- अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे भोकरदन तालुका वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यातील प्रकल्पांची तहान कायम आहे. शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत शनिवारी परतीच्या पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविल्याने सर्वसामान्यांना मोठ्या पावसाची अशा कायम आहे.मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरीच्या साधारणत: ८० टक्क्यांपर्यंत जिल्ह्यात पाऊस झाला आहे. मात्र मोठे पाऊस न झाल्याने भोकरदन तालुका वगळता इतर तालुक्यातील प्रकल्पांची तहान कायम असून, अर्ध्याहून अधिक प्रकल्प कोरडेठाक आहेत. शनिवारी सायंकाळी तासभर जालना शहरासह परिसरात परतीच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. यातून वाट शोधताना नागरिकांना कसरत करावी लागली.परतूर शहरासह परिसरात शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. परतूर शहरासह अंबा, कावजवळा, आनंदवाडी, रोहिणा, एकरूखा, कोरेगाव, मापेगाव, शिंगोना, सोंयजना, पाडळी, राहीणा (बु.), बामणी, शेलवडा, वरफळ, चिंचोली, रायपूर, सिरसगाव इ. भागांत या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे सोयाबीन पिकाला मात्र फटका बसणार आहे.भोकरदन तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील शेतकरी सध्या सोयाबीन, मका या खरीप पिकाची सोंगणी करीत आहे. मात्र; दोन दिवसापासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील भोकरदन, पारध, वालसावगी, धावडा, केदारखेड, राजूर, आनवा, आव्हाना, सिपोरा बाजार, दानापूर, जळगाव सपकाळ, नळणी या भागांत पाऊस झाला.या पावसाचा खरीप पिकांना फटका बसला आहे. राजूर भागात झालेल्या पावसामुळे कपाशीला जीवदान मिळाले आहे. शिवाय रबी पिकांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या भागातील चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामुळे राजूरसह परिसरातील पंधरा गावांचा पाणी प्रश्न बिकट आहे. त्यामुळे पंधरा गावांतील नागरिकांना हिवाळ्यातच पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे. तसेच दाभाडी व परिसरातही पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आणखी मोठा पाऊस झाला तर रबी हंगामाला दिलासा मिळणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र, जलसाठे भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.वीज पडून बैलाचा मृत्यूवडोद तांगडा : भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील विठ्ठल रंगनाथ तांगडे हे शनिवारी दुपारी बैलगाडी घेऊन घराकडे येत होते. त्यावेळी अचानक वीज पडल्याने एका बैलाचा मृत्यू झाला. यात तांगडे यांचे जवळपास ४० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेने शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.अवजड वाहने चिखलात फसलीवालसावंगी : वालसावंगी- पारध रस्त्याच्या कडेला दोन वाहने चिखलात फसली होती. दोन्ही वाहने जवळजवळ फसल्याने या मार्गावरील वाहतूक तीन ते चार तास विस्कळीत झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ही वाहने रस्त्यावरच थांबल्याने या मार्गावरून येणा-या- जाणा-या नागरिकांसह शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

टॅग्स :RainपाऊसweatherहवामानNatureनिसर्गwater shortageपाणीकपात