शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने शहरातील सखल भागात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 01:00 IST

जिल्ह्याच्या विविध भागांत शनिवारी परतीच्या पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविल्याने सर्वसामान्यांना मोठ्या पावसाची अशा कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा वार्षिक सरासरीच्या ८० टक्क्यापर्यंत पाऊस झाला आहे. मात्र, कमी- अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे भोकरदन तालुका वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यातील प्रकल्पांची तहान कायम आहे. शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत शनिवारी परतीच्या पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविल्याने सर्वसामान्यांना मोठ्या पावसाची अशा कायम आहे.मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरीच्या साधारणत: ८० टक्क्यांपर्यंत जिल्ह्यात पाऊस झाला आहे. मात्र मोठे पाऊस न झाल्याने भोकरदन तालुका वगळता इतर तालुक्यातील प्रकल्पांची तहान कायम असून, अर्ध्याहून अधिक प्रकल्प कोरडेठाक आहेत. शनिवारी सायंकाळी तासभर जालना शहरासह परिसरात परतीच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. यातून वाट शोधताना नागरिकांना कसरत करावी लागली.परतूर शहरासह परिसरात शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. परतूर शहरासह अंबा, कावजवळा, आनंदवाडी, रोहिणा, एकरूखा, कोरेगाव, मापेगाव, शिंगोना, सोंयजना, पाडळी, राहीणा (बु.), बामणी, शेलवडा, वरफळ, चिंचोली, रायपूर, सिरसगाव इ. भागांत या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे सोयाबीन पिकाला मात्र फटका बसणार आहे.भोकरदन तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील शेतकरी सध्या सोयाबीन, मका या खरीप पिकाची सोंगणी करीत आहे. मात्र; दोन दिवसापासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील भोकरदन, पारध, वालसावगी, धावडा, केदारखेड, राजूर, आनवा, आव्हाना, सिपोरा बाजार, दानापूर, जळगाव सपकाळ, नळणी या भागांत पाऊस झाला.या पावसाचा खरीप पिकांना फटका बसला आहे. राजूर भागात झालेल्या पावसामुळे कपाशीला जीवदान मिळाले आहे. शिवाय रबी पिकांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या भागातील चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामुळे राजूरसह परिसरातील पंधरा गावांचा पाणी प्रश्न बिकट आहे. त्यामुळे पंधरा गावांतील नागरिकांना हिवाळ्यातच पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे. तसेच दाभाडी व परिसरातही पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आणखी मोठा पाऊस झाला तर रबी हंगामाला दिलासा मिळणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र, जलसाठे भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.वीज पडून बैलाचा मृत्यूवडोद तांगडा : भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील विठ्ठल रंगनाथ तांगडे हे शनिवारी दुपारी बैलगाडी घेऊन घराकडे येत होते. त्यावेळी अचानक वीज पडल्याने एका बैलाचा मृत्यू झाला. यात तांगडे यांचे जवळपास ४० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेने शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.अवजड वाहने चिखलात फसलीवालसावंगी : वालसावंगी- पारध रस्त्याच्या कडेला दोन वाहने चिखलात फसली होती. दोन्ही वाहने जवळजवळ फसल्याने या मार्गावरील वाहतूक तीन ते चार तास विस्कळीत झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ही वाहने रस्त्यावरच थांबल्याने या मार्गावरून येणा-या- जाणा-या नागरिकांसह शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

टॅग्स :RainपाऊसweatherहवामानNatureनिसर्गwater shortageपाणीकपात