शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कुपोषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:13 AM

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यात केलेल्या तपासणीत ० ते ५ वयोगटातील १२८९ बालके कुपोषित आढळून आली आहेत.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कुपोषणमुक्तीसाठी राज्य शासनामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहे. असे असले तरी ग्रामीण भागात कुपोषणाची समस्या अद्याप कायम आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यात केलेल्या तपासणीत ० ते ५ वयोगटातील १२८९ बालके कुपोषित आढळून आली आहेत. यामध्ये तीव्र कुपोषित बालकांची संख्या २९९ इतकी आहे.कुपोषित बालकांच्या श्रेणी संवर्धनाची जबाबदारी महिला व बालविकास विभाग व आरोग्य विभागाकडे आहे. जिल्ह्यातील कुपोषित मुलांचा शोध घेण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, आशा कार्यकर्त्यांमार्फत जिल्ह्यातील एक हजार ९५४ अंगणवाड्यांमध्ये ० ते पाच वयोगटातील एक लाख ३९ हजार २७७ बालकांची तपासणी करण्यात आली. बालकांचे वजन व उंची वयानुसार योग्य आहे का, त्यांच्या कमरेचा व दंडाचा घेर याचे मोजमाप करून कुपोषित व तीव्र कुपोषित, असे वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिका-यांमार्फत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ९९० बालके मध्यम तर २९९ बालके गंभीर तीव्र कुपोषित आढळून आली आहेत. अंबड, भोकरदन, जाफराबाद या तालुक्यांत कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे. आता या कुपोषित बालकांना सर्वसामान्य बालकांच्या श्रेणीत आणण्यासाठी अंगणवाडी स्तरावर ग्राम बाल विकास केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. या केंद्राच्या माध्यमातून कुपोषित बालकांना १२ आठवडे विशेष पूरक आहाराचे वाटप केले जाणार आहे. आहार वाटप सुरू असताना प्रत्येक आठवड्याला बालकांचे वजन तपासले जाणार आहे. कमी वजनाची मुले सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत येत नाहीत, तोपर्यंत ग्राम केंद्र सुरू राहणार आहे. ज्या बालकांच्या वजनात वाढ होत नाही, अशांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. यात मुलांना नेमका कोणता आजार आहे याचे निदान करण्यात येणार आहे.