शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

जालन्यातील शेतकऱ्यांना ११० कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 00:45 IST

शासनाने मदत जाहीर केली असून, जालना जिल्ह्याला ती ११० कोटी रूपये मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळ्यात भोकरदन आणि जाफराबाद तालुका वगळता अन्य सहा तालुक्यांमध्ये पावसासाठी प्रतीक्षा करावी लागली. जेमतेम पावसात शेतकऱ्यांनी खरिपाची पिके तगवली. आता केवळ सांगनी करून सोयाबीन बाजारात नेणे तेवढे शिल्लक असताना, परतीच्या पावसाने त्याची दाणादास उडवून दिली. यात सर्वात जास्त फटका सोयाबीन आणि मका पिकाला बसला आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होऊन चार लाख ८० हेक्टरवरील नुकसान झाले होते. यानुसार शासनाने मदत जाहीर केली असून, जालना जिल्ह्याला ती ११० कोटी रूपये मिळाली आहे.जिल्ह्यात पावसाळ्यात भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यात मुबलक पाऊस पडला. परंतु अन्य तालुक्यात पावसासाठी शेतकºयांच डोळे आभाळाकडे लागून होते. परंतु पावसाळा संपल्यावरही या सहा तालुक्यात सरासरी एवढा पाऊस झाला नव्हता. परंतु नंतर आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने ही पावसाची तूट भरून काढली. तूट भरून काढतांना हातातोंडाशी आलेल्या पिकांसाठी हा पाऊस नुकसानदायी ठरला. यामुळे शेतक-यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते.हे झालेले नुकसान भरून निघत नसल्याने शेतक-यांनी नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने पंचनामे केले. यावेळी कृषी विभाग तसेच महसूल आणि ग्रामसेवकांनी या महत्त्वाची भूमिका निभावली. जिल्ह्यातील पंचनामे केल्यावर जे नुकसान झाले आहे, त्यापोटी राज्य सरकारने जुन्या निकषानुसारच ही मदत देऊ केली आहे. राज्यात सरकार नसतांना राज्यपालांनी ही मदत जाहीर केली आहे. आता ही ११० कोटींची मदत जिल्ह्यासाठी मंजूर आहे. त्यात आता ज्या तालुक्यात जास्त क्षेत्राचे नुकसान झाले, त्यानुसार त्यांचे वाटप तालुकानिहाय होऊन नंतर ते अनुदान तहसील पातळीवरून शेतक-यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे.राज्यात परतीच्या पावसाने जेनुकसान झाले आहे, त्या नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत देण्यासाठी १३ मे २०१५ चा अध्यादेश ग्राह्य धरला आहे. त्यानुसार कोरडवाहू शेतक-यांना प्रतिहेक्टरी सहा हजार ८०० रूपये तर, बागयायती शेतक-यांच्या नुकसानीपोटी आठ हजार रूपये प्रतिहेक्टरी मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :fundsनिधीFarmerशेतकरीGovernmentसरकारRainपाऊस