शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

जालन्यातील शेतकऱ्यांना ११० कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 00:45 IST

शासनाने मदत जाहीर केली असून, जालना जिल्ह्याला ती ११० कोटी रूपये मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळ्यात भोकरदन आणि जाफराबाद तालुका वगळता अन्य सहा तालुक्यांमध्ये पावसासाठी प्रतीक्षा करावी लागली. जेमतेम पावसात शेतकऱ्यांनी खरिपाची पिके तगवली. आता केवळ सांगनी करून सोयाबीन बाजारात नेणे तेवढे शिल्लक असताना, परतीच्या पावसाने त्याची दाणादास उडवून दिली. यात सर्वात जास्त फटका सोयाबीन आणि मका पिकाला बसला आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होऊन चार लाख ८० हेक्टरवरील नुकसान झाले होते. यानुसार शासनाने मदत जाहीर केली असून, जालना जिल्ह्याला ती ११० कोटी रूपये मिळाली आहे.जिल्ह्यात पावसाळ्यात भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यात मुबलक पाऊस पडला. परंतु अन्य तालुक्यात पावसासाठी शेतकºयांच डोळे आभाळाकडे लागून होते. परंतु पावसाळा संपल्यावरही या सहा तालुक्यात सरासरी एवढा पाऊस झाला नव्हता. परंतु नंतर आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने ही पावसाची तूट भरून काढली. तूट भरून काढतांना हातातोंडाशी आलेल्या पिकांसाठी हा पाऊस नुकसानदायी ठरला. यामुळे शेतक-यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते.हे झालेले नुकसान भरून निघत नसल्याने शेतक-यांनी नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने पंचनामे केले. यावेळी कृषी विभाग तसेच महसूल आणि ग्रामसेवकांनी या महत्त्वाची भूमिका निभावली. जिल्ह्यातील पंचनामे केल्यावर जे नुकसान झाले आहे, त्यापोटी राज्य सरकारने जुन्या निकषानुसारच ही मदत देऊ केली आहे. राज्यात सरकार नसतांना राज्यपालांनी ही मदत जाहीर केली आहे. आता ही ११० कोटींची मदत जिल्ह्यासाठी मंजूर आहे. त्यात आता ज्या तालुक्यात जास्त क्षेत्राचे नुकसान झाले, त्यानुसार त्यांचे वाटप तालुकानिहाय होऊन नंतर ते अनुदान तहसील पातळीवरून शेतक-यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे.राज्यात परतीच्या पावसाने जेनुकसान झाले आहे, त्या नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत देण्यासाठी १३ मे २०१५ चा अध्यादेश ग्राह्य धरला आहे. त्यानुसार कोरडवाहू शेतक-यांना प्रतिहेक्टरी सहा हजार ८०० रूपये तर, बागयायती शेतक-यांच्या नुकसानीपोटी आठ हजार रूपये प्रतिहेक्टरी मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :fundsनिधीFarmerशेतकरीGovernmentसरकारRainपाऊस