शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अंतरवाली सराटी दगडफेक: अंबड पोलिसांकडून तिघांना अटक; गावठी पिस्टल, काडतुसे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 12:46 IST

तिन्ही आरोपींना दोन डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

वडीगोद्री/अंबड: अंतरवाली सराटी येथे पोलिस व मराठा आंदोलक यांच्यात झालेला लाठीहल्ला व दगडफेकीच्या घटनेत पोलिसांनी ऋषिकेश बेदरे आणि तर दोघे अशा तिघांना अटक केली आहे. बेदरेकडून एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, एक साधा मोबाइल जप्त केला असून, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व अंबड पोलिसांनी केली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात कलम ३/२५ भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंतरवाली सराटी येथे १ सप्टेंबर रोजी झालेल्या लाठीहल्ल्यात मनोज जरांगे पाटील यांच्या काही सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी व महसूल अधिकारी यांच्याशी हुज्जत घालून पोलिसांना जिवे ठार मारण्याचा कट रचणे, पोलिसांवर दगडफेक करून गंभीर जखमी करणे, पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून खाजगी वाहन जाळणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे व संबंधित प्रकरणांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये ऋषिकेश बेदरे (रा. गेवराई, जि. बीड) याचे पहिले नाव आहे. त्याच्यावर कलम ३०७, ३३३, ३३२, ३५३, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातीलच आरोपीचा तपास घेत असताना ऋषिकेश कैलास बेदरे व दोघांकडे २० हजार रुपये किमतीचे गावठी लोखंडी धातूचे पिस्टल, २०० रुपये किमतीचे ७.६५ एमएमचे दोन जिवंत काडतुसे, १ हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा मोबाइल, असा मुद्देमाल मिळून आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व अंबड पोलिसांकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपींना न्यायालयीन कोठडीतपासानंतर २४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी चार संशयित आरोपींना बीड जिल्ह्यातील गेवराई येथून ताब्यात घेतले. यातील तिघांना अंबड येथील जिल्हा व अपर सत्र न्यायालयात आज सकाळी हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली. तर एका आरोपीबद्दल ठोस पुरावे मिळाले नसल्यामुळे त्याला नातेवाईकाच्या हवाली करण्यात आले.

हा कुठला डाव ?अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणात पोलिसांनी दोन महिन्यांनी तिघांना अटक केली आहे, या अटकेवर मनोज जरांगे पाटील यांनी आमच्या लोकांना अटक करण्याचा हा कुठला डाव ? असा सवाल केला आहे. 'सरकारने आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अटक केली.अंतरावली सराटीत आमच्यावर हल्ला झाला. आम्ही कट रचला नव्हता' असे देखील जरांगे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :JalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलCrime Newsगुन्हेगारी