शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग; माहेरच्यांनी पायात साखळदंड बांधून विवाहितेला घरात कोंडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:07 IST

खंडपीठाने आदेश दिल्यानंतर पोलिसांनी केली सुटका

भोकरदन : पायात साखळदंड बांधून दोन महिने घरात कोंडून ठेवलेल्या विवाहितेची भोकरदन पोलिसांनी आलापूर भागातून सुटका केली. पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठामार्फत तिला पतीच्या स्वाधीन केले.

भोकरदन शहरालगतच्या आलापूर येथील खालिद शहा सिकंदर शहा यांची मुलगी शहनाज उर्फ सोनल हिचे कुटुंबीय छत्रपती संभाजीनगर येथील मिसाळवाडीत राहत असताना, सागर संजय ढगेसोबत आंतरधर्मीय विवाह केला. त्यानंतर शहा कुटुंबीय आलापूर येथे परत आले. या विवाह संबंधातून शहनाजला ३ वर्षांचा कार्तिक झाला आहे. साधारणतः दोन महिन्यांपूर्वी शहनाजच्या मोठ्या बहिणीची प्रसूती झाल्याने तिचे बाळ पाहण्याच्या कारणाने आईने तिला व पती सागर यांना आलापूर येथे बोलावून घेतले. ते या ठिकाणी आले असता, शहनाज व मुलगा कार्तिकला तिच्या आई-वडिलांनी घरात ठेवून घेतले व पती सागरला घरातून हाकलून दिले. त्यानंतर ७ डिसेंबर रोजी सागर पुन्हा पत्नीला घेण्यासाठी गेला असता, तुझा व आमचा धर्म वेगळा असून, आम्ही शहनाजचे आमच्या धर्मात दुसरे लग्न लावून देणार आहोत, असे म्हणत सागरला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत हाकलून दिले. 

मात्र, २४ डिसेंबर रोजी शहनाजच्या बहिणीने सागरला फोन करून शहनाज व मुलाला घरात डांबून ठेवल्याचे सांगितले. त्यामुळे सागरने खंडपीठात धाव घेऊन पत्नी व मुलाची सुटका करण्याची विनंती केली. त्यानंतर उच्च न्यायालयाने भोकरदन पोलिसांना शहनाज व मुलगा कार्तिकची सुटका करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी उपनिरीक्षक बी. टी. सहाने व महिला कर्मचारी सीमा देठे आलापूर येथील खालेद शहा यांच्या घरात घुसून शहनाज व कार्तिकला ताब्यात घेतले. यावेळी शहनाजचे दोन्ही पाय साखळदंडाने बांधून त्यांना दोन कुलूप लावल्याचे आढळून आले. पोलिसांनी कुलपांच्या बनावट किल्ल्या तयार करून कुलपे उघडून शहनाजला मुक्त केले. त्यानंतर २९ जानेवारी रोजी उपनिरीक्षक सहाणे यांनी शहनाज व कार्तिक यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त सरकारी अभियाेक्ता ए. आर. काळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात हजर करून पती सागरच्या स्वाधीन केले.

खंडपीठाने आदेश दिले, आम्ही सुटका केलीया प्रकरणाची पोलिसांना कल्पना नव्हती. मात्र, खंडपीठाने आदेश दिल्यानंतर प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आले. खालिद शहा कुटुंब मनोरुग्ण असल्यासारखे वागत असल्याने कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती. मात्र, गोपनीय पद्धतीने माहिती जमा करून पोलिसांनी शेवटी शहनाज व कार्तिकची सुटका केली.- बी. टी. सहाणे, पोलिस उपनिरीक्षक पोलीस ठाणे भोकरदन.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ