शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग; माहेरच्यांनी पायात साखळदंड बांधून विवाहितेला घरात कोंडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:07 IST

खंडपीठाने आदेश दिल्यानंतर पोलिसांनी केली सुटका

भोकरदन : पायात साखळदंड बांधून दोन महिने घरात कोंडून ठेवलेल्या विवाहितेची भोकरदन पोलिसांनी आलापूर भागातून सुटका केली. पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठामार्फत तिला पतीच्या स्वाधीन केले.

भोकरदन शहरालगतच्या आलापूर येथील खालिद शहा सिकंदर शहा यांची मुलगी शहनाज उर्फ सोनल हिचे कुटुंबीय छत्रपती संभाजीनगर येथील मिसाळवाडीत राहत असताना, सागर संजय ढगेसोबत आंतरधर्मीय विवाह केला. त्यानंतर शहा कुटुंबीय आलापूर येथे परत आले. या विवाह संबंधातून शहनाजला ३ वर्षांचा कार्तिक झाला आहे. साधारणतः दोन महिन्यांपूर्वी शहनाजच्या मोठ्या बहिणीची प्रसूती झाल्याने तिचे बाळ पाहण्याच्या कारणाने आईने तिला व पती सागर यांना आलापूर येथे बोलावून घेतले. ते या ठिकाणी आले असता, शहनाज व मुलगा कार्तिकला तिच्या आई-वडिलांनी घरात ठेवून घेतले व पती सागरला घरातून हाकलून दिले. त्यानंतर ७ डिसेंबर रोजी सागर पुन्हा पत्नीला घेण्यासाठी गेला असता, तुझा व आमचा धर्म वेगळा असून, आम्ही शहनाजचे आमच्या धर्मात दुसरे लग्न लावून देणार आहोत, असे म्हणत सागरला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत हाकलून दिले. 

मात्र, २४ डिसेंबर रोजी शहनाजच्या बहिणीने सागरला फोन करून शहनाज व मुलाला घरात डांबून ठेवल्याचे सांगितले. त्यामुळे सागरने खंडपीठात धाव घेऊन पत्नी व मुलाची सुटका करण्याची विनंती केली. त्यानंतर उच्च न्यायालयाने भोकरदन पोलिसांना शहनाज व मुलगा कार्तिकची सुटका करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी उपनिरीक्षक बी. टी. सहाने व महिला कर्मचारी सीमा देठे आलापूर येथील खालेद शहा यांच्या घरात घुसून शहनाज व कार्तिकला ताब्यात घेतले. यावेळी शहनाजचे दोन्ही पाय साखळदंडाने बांधून त्यांना दोन कुलूप लावल्याचे आढळून आले. पोलिसांनी कुलपांच्या बनावट किल्ल्या तयार करून कुलपे उघडून शहनाजला मुक्त केले. त्यानंतर २९ जानेवारी रोजी उपनिरीक्षक सहाणे यांनी शहनाज व कार्तिक यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त सरकारी अभियाेक्ता ए. आर. काळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात हजर करून पती सागरच्या स्वाधीन केले.

खंडपीठाने आदेश दिले, आम्ही सुटका केलीया प्रकरणाची पोलिसांना कल्पना नव्हती. मात्र, खंडपीठाने आदेश दिल्यानंतर प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आले. खालिद शहा कुटुंब मनोरुग्ण असल्यासारखे वागत असल्याने कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती. मात्र, गोपनीय पद्धतीने माहिती जमा करून पोलिसांनी शेवटी शहनाज व कार्तिकची सुटका केली.- बी. टी. सहाणे, पोलिस उपनिरीक्षक पोलीस ठाणे भोकरदन.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ