शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अन् पोखरी-सिंंदखेडमध्ये गंगा अवतरल्याने ग्रामस्थ हरखले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 01:10 IST

दुष्काळावर मात करण्यासाठी शिवसेनेकडून मुकबला दुष्काळाचा ही मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी जवळपास २० पेक्षा अधिक गावात हातपंप घेणे, पाण्याच्या टाक्यांचे वाटप करणे, विद्युत मोटार उपलब्ध करून देण्यासह गुरांसाठीचा चारा पुरविण्याचे काम या अंतर्गत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी सोमवारी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळावर मात करण्यासाठी शिवसेनेकडून मुकबला दुष्काळाचा ही मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी जवळपास २० पेक्षा अधिक गावात हातपंप घेणे, पाण्याच्या टाक्यांचे वाटप करणे, विद्युत मोटार उपलब्ध करून देण्यासह गुरांसाठीचा चारा पुरविण्याचे काम या अंतर्गत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी सोमवारी दिली.सोमवारी जालना तालुक्यातील पोखरी-सिंदखेड येथे दानशूर संदीप गायकवाड यांच्या पुढाकारातून हातपंप घेऊन त्यावर विद्युत मोटार बसवून दिल्याने या भागातील पाणीप्रश्न ऐन दुष्काळा सुटला आहे. या उपक्रमाचे जलपूजन सोमवारी संदीप गायकवाड यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह नगरसेवक विष्णू पाचफुले, जिल्हा परिषद सदस्य बबनराव खरात, प्रभाकर घडलिंग, सर्जेराव शेवाळे, संजय देठे, ब्रह्मा वाघ, हरिहर शिंदे यांचू प्रमुख उपस्थिती होती.यंदाचा दुष्काळ तीव्र स्वरूपाचा आहे. ही बाब लक्षात घेऊन आपण फेब्रवारीपासूनच जालना तालुक्यातील जवळपास ३० पेक्षा अधिक गावांचा दौरा केला होता. तेथील समस्य आणि अडचणी जाणून घेऊन त्या गावांना जालन्यातील दानशूर व्यक्ती, उद्योजकांकडून मदत देण्यासाठी चा एक कृती कार्यक्रम तयार केला. त्यानुसार त्यांच्याकडे जावून आणि ग्रामीण भागातील दुष्काळाची दाहकता त्यांच्या लक्षात आणून देऊन समाजाचे आपणही काही देणे लागतो यातून या सर्वांची मोठी साथ मिळाली. त्यातच डॉक्टरांची संघटना असलेल्या आयएमए ने देखील याकामी मोठी मदत केली.दुष्कळावर फुंकर घालण्यासाठी शासनाच्या उपाय योजना पाहिजे तेवढ्या समाधानकारक नाहीत, त्यामुळे समासजातील अर्थसंपन्न व्यक्तींची मदत घेऊनच त्यावर मात करणे शक्य होणार असल्याचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी यावेळी सांगितले. संदीप गायकवाड यांनी देखील आपल्याला ही संधी मिळाल्या बद्दल शिवसेनेचे आभार मानले. यावेळी संतोष खरात, विठ्ठल खरात, कडूबा इंदलकर, दत्ता खलसे, मधुकर खरात, राधाकिसन खरात, सोपान कावळे, प्रकाश खरात, शिवाजी जाधव, नंदू पारळकर, शिवाजी घडलिंग, मिरजा जिने, किसन घडलिंग, पंडित खरात आदींची उपस्थिती होती.

 

टॅग्स :SocialसामाजिकWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प