शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कडवंचीत होणार अ‍ॅम्युनिटी सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 00:50 IST

जालना तालुक्यातील कडवंची येथे रोड साईड अ‍ॅम्युनिटी सेंटर ४० एकर परिसरावर होणार आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई-नागपूर या आठ पदरी होऊ घातलेल्या समृद्धी महामार्गाचे काम जालना जिल्ह्यात प्रगतीपथावर आहे. संपूर्ण राज्यात जिल्ह्याचे काम ६० टक्क्यापेक्षा अधिक झाले आहे. या रस्त्यालगत जालना तालुक्यातील कडवंची येथे रोड साईड अ‍ॅम्युनिटी सेंटर ४० एकर परिसरावर होणार आहे. यासाठी मुंबई येथील एक पथक नुकतेच कडवंची येथे भेट देऊन गेले. याच दरम्यान रखडलेला इंटरचेंजचा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्ग जालना जिल्ह्यातील २५ गावांमधून जातो. त्यासाठी ११५४ शेतकऱ्यांची जवळपास ५१० हेक्टर जमीन संपादित केल्यानंतर महामार्गाचे काम मार्गी लागले आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत हे काम सर्वात जास्त प्रगतीपथावर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, हा रस्ता आठ पदरी असून आतापर्यंत जालना जिल्ह्यातील शेतकºयांना पाचशे ते सातशे कोटी रुपये मावेजा म्हणून मिळाले आहे.जालना येथून हा महामार्ग सर्वात जवळून जात आहे. शहरापासून अवघ्या आठ कि़मी. वरुन जाणार असल्याने येथून या मार्गावर जाण्यासाठी आणि येथे येण्यासाठी इंटरचेंज (चढउतार पॉईट) करण्यात येणार आहे. हा इंटरचेंज नेमका कुठल्या भागात होणार याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही; परंतु हा निर्णय देखील येत्या काही दिवसांमध्ये होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. निधोना येथील ट्रक टर्मिनस बाबतही निर्णय अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.गायरान जमीन : ४० एकर जागा सहज उपलब्ध होणारतीन दिवसांपूर्वी कडवंची येथे मुंबई येथून अभियंत्यांचे पथक पाहणीसाठी आले होते. यामध्ये कडवंची गावाजवळ मोठ्या प्रमाणावर शासकीय गायरान जमीन आहे. येथे अ‍ॅम्युनिटी सेंटर उभारण्यासाठी चाळीस एकर जागा सहज उपलब्ध होणार आहे. या अ‍ॅम्युनिटी सेंटर सोबतच रुग्णालय, पेट्रोलपंप, शाळा आदींसह हॉटेल उभारणीदेखील होऊ शकते त्यादृष्टीने आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सागिंले. यावेळी कडवंचीचे ग्रामस्थही उपस्थित होते.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गpwdसार्वजनिक बांधकाम विभागGovernmentसरकार