शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

आंबेडकरांना अपेक्षित लोकशाही अजून रुजलीच नाही- मिटकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:14 IST

आपलं मत म्हणजे चोवीस कॅरेट सोनं आहे, ते विकू नका, असे प्रतिपादन व्याख्याते अमोल मिटकरी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जातीची उतरंड आजही जशास तशीच आहे. सत्तेच्या दलालांनी तुम्हा- आम्हाला फुले-शाहू- आंबेडकर कळूच दिले नाहीत. आजही ही मंडळी आपला वापर केवळ त्यांच्या सत्तेसाठीच वापरुन घेत आहेत. त्यासाठी जागे व्हा! डॉ. आंबेडकरांना अपेक्षित लोकशाही का रुजली नाही? तर आजही आम्ही खऱ्या अर्थाने जागे झालेलो नाहीत. म्हणूनच जागे व्हावा आणि बाबासाहेबांनी दिलेल्या मतदानाचा हक्क इमाने - इतबारे बजवा. आपलं मत म्हणजे चोवीस कॅरेट सोनं आहे, ते विकू नका, असे प्रतिपादन व्याख्याते अमोल मिटकरी यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना मिटकरी बोलत होते. यावेळी विचारपीठावर अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, सहायक पोलीस निरीक्षक पल्लवी जाधव, सुधाकर रत्नपारखे, अध्यक्ष अरुण मगरे, सचिव सुहास साळवे यांची उपस्थिती होती. बाबासाहेबांनी कोणा एका धर्मासाठी, कोणा एका जातीसाठी नव्हे तर तमाम मानवतावादी दृष्टीकोन ठेवून घटनेची निर्मीती केली. मात्र, संधीसाधूंना बाबासाहेबांचे हे कार्य रुचले नाही, म्हणून त्यांनी ज्या- ज्या प्रकारे त्यांचा छळ करता येईल, ती सर्व नीती वापरुन त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. जगाच्या पाठीवर भारताची राज्य घटना एकमेव अशी आहे की, जी केवळ आणि केवळ मानव जातीला समर्पित आहे. म्हणूनच बाबासाहेबांचे विदेशात सत्कार झाले. परंतु त्यांना हाच सन्मान देशात मिळाला नाही. उलट ते जेथे बसले ती जागा गोमूत्राने धुवून काढण्यात आली इतकी कूटनीती इथल्या धर्मियांनी खेळली. माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं असून, ते कोणीही हिरावू शकत नाही. बाबासाहेबांनी घटना लिहीतांना अगदी बारीक- सारीक गोष्टींचा विचार केलेला आहे. लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम हे लोकांचं असून ते जर का त्यांनी इमाने - इतबारे केलं नाही तर उद्भवणाऱ्या परिस्थितीला तेच कारणीभूत ठरतील, असं बाबासाहेब त्यावेळी म्हणाले होते. म्हणूनच जागे व्हा ! बाबासाहेबांना अपेक्षित अशी लोकशाही आजही का रुजली नाही तर त्याला आपणच कारणीभूत आहोत!मतदान म्हणजे २४ कॅरेटचेसोने ते विकू नकाकोणाला पाडायचे आणि कोणाला सत्तेत ठेवायचे हे मतदारांना घटनेने दिलेल्या मतदानाच्या हक्कातून सर्वसामान्य जनता ठरवू शकते यामुळे कितीही आमिष आले तरी आपले अमूल्य सोन्यासारखे मत विकू नका. कोणाला मतदान करायचे ते तुम्हीच ठरवा, मात्र मत विकून लाचार होऊ नका.कारण रक्तपाताशिवाय रुजणारी लोकशाही बाबासाहेबांना अभिप्रेत होती, हे विसरु नका, असेही शेवटी मिटकरी यांनी सांगितले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीdemocracyलोकशाही