शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कृषीसोबतच आता शिक्षणातही पाणलोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:25 IST

जालना येथे कार्यरत असलेल्या मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्यावतीने गेल्या दशकात जिल्ह्यातील बहुतांश गावात पाणलोटाची कामे करण्यात आल्याने ती गावे पाणीदार झाली आहे.

विष्णू वाकडे ।लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना येथे कार्यरत असलेल्या मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्यावतीने गेल्या दशकात जिल्ह्यातील बहुतांश गावात पाणलोटाची कामे करण्यात आल्याने ती गावे पाणीदार झाली आहे. या मंडळाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी ज्ञानगंगा गावोगावी पोहचवून जणू शिक्षणातही पाणलोट करून मुलांना बदलत्या प्रवाहात आणून सोडले आहे.मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या माध्यमातून कृषीरत्न विजयअण्णा बोराडे आणि त्यांचे सहकारी यांनी २००३ मध्ये कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली. महिन्याला शेतकऱ्यांना चर्चासत्राच्या माध्यमातून तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली शेती व्यवसायात शिक्षित करण्याचा सुरू केलेला प्रयत्न आजही कायम आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायात कृषी विज्ञान केंद्रामुळे चांगले परिवर्तन घडून आले. ब-याच शेतक-यांच्या यशोगाथा तयार झाल्या. ते कृषी विज्ञान केंद्रामुळे. पाणलोटमध्येही आसरखेडा असो की कडवंची ते शिवणीसह बहुतांश गावांनी वाहते पाणी थांबविले. यामुळे पाणलोटाची कामे झालेली गावे आजही भयावह दुष्काळावर मात करीत आहेत.कृषी विज्ञान केंद्रात हजारो महिला, युवक व युवतींना वेगवेगळे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्याचे स्वप्न पूर्ण केले गेले. रेशीम उद्योगपासून ते शेळीपालनापर्यंत शेतीपुरक व्यवसायाची सुरुवात मोठ्या प्रमाणात महिला तसेच पुरुषांनी केली आहे.हे काम करीत असताना मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या नजरेतून सद्य स्थितीतील शिक्षणातील स्पर्धा सुटली नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी येथे निवासी शाळा असावी असा विचार पुढे आल्यानंतर कृषीरत्न विजयअण्णा बोराडे तसेच कृषीभूषण भगवानराव काळे आणि येथील विश्वस्त यांनी आमची शाळा नावाची निवासी शाळा २००३ मध्ये खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात सुरू केली. २००८ मध्ये दहावीची पहिली बॅच १०० टक्के निकाल देऊन बाहेर पडली.मुलींनाही शिक्षण२०१२ च्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतक-यांच्या मुलींनाही येथे शिक्षण देण्यात आले. एवढेच नाही तर २००४ मध्ये कृषी तज्ञ विद्यालयाची स्थापना करण्यात आली. या विद्यालयातून जवळपास ५०० विद्यार्थी कृषी पदविकाधारक बनले. जिल्ह्यात कृषी शिक्षणात मानाचा तुरा खोवणाºया कृषी महाविद्यालयाची सुरूवात २००८ मध्ये करण्यात आली. या महाविद्यालयात आतापर्यंत जवळपास ७०० विद्यार्थ्यांनी बीएससी अ‍ॅग्रीचे शिक्षण पूर्ण करून बहुसंख्येने आता आपल्या पायावर उभे आहेत.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळEducation Sectorशिक्षण क्षेत्रSocialसामाजिक