शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषीसोबतच आता शिक्षणातही पाणलोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:25 IST

जालना येथे कार्यरत असलेल्या मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्यावतीने गेल्या दशकात जिल्ह्यातील बहुतांश गावात पाणलोटाची कामे करण्यात आल्याने ती गावे पाणीदार झाली आहे.

विष्णू वाकडे ।लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना येथे कार्यरत असलेल्या मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्यावतीने गेल्या दशकात जिल्ह्यातील बहुतांश गावात पाणलोटाची कामे करण्यात आल्याने ती गावे पाणीदार झाली आहे. या मंडळाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी ज्ञानगंगा गावोगावी पोहचवून जणू शिक्षणातही पाणलोट करून मुलांना बदलत्या प्रवाहात आणून सोडले आहे.मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या माध्यमातून कृषीरत्न विजयअण्णा बोराडे आणि त्यांचे सहकारी यांनी २००३ मध्ये कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली. महिन्याला शेतकऱ्यांना चर्चासत्राच्या माध्यमातून तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली शेती व्यवसायात शिक्षित करण्याचा सुरू केलेला प्रयत्न आजही कायम आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायात कृषी विज्ञान केंद्रामुळे चांगले परिवर्तन घडून आले. ब-याच शेतक-यांच्या यशोगाथा तयार झाल्या. ते कृषी विज्ञान केंद्रामुळे. पाणलोटमध्येही आसरखेडा असो की कडवंची ते शिवणीसह बहुतांश गावांनी वाहते पाणी थांबविले. यामुळे पाणलोटाची कामे झालेली गावे आजही भयावह दुष्काळावर मात करीत आहेत.कृषी विज्ञान केंद्रात हजारो महिला, युवक व युवतींना वेगवेगळे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्याचे स्वप्न पूर्ण केले गेले. रेशीम उद्योगपासून ते शेळीपालनापर्यंत शेतीपुरक व्यवसायाची सुरुवात मोठ्या प्रमाणात महिला तसेच पुरुषांनी केली आहे.हे काम करीत असताना मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या नजरेतून सद्य स्थितीतील शिक्षणातील स्पर्धा सुटली नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी येथे निवासी शाळा असावी असा विचार पुढे आल्यानंतर कृषीरत्न विजयअण्णा बोराडे तसेच कृषीभूषण भगवानराव काळे आणि येथील विश्वस्त यांनी आमची शाळा नावाची निवासी शाळा २००३ मध्ये खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात सुरू केली. २००८ मध्ये दहावीची पहिली बॅच १०० टक्के निकाल देऊन बाहेर पडली.मुलींनाही शिक्षण२०१२ च्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतक-यांच्या मुलींनाही येथे शिक्षण देण्यात आले. एवढेच नाही तर २००४ मध्ये कृषी तज्ञ विद्यालयाची स्थापना करण्यात आली. या विद्यालयातून जवळपास ५०० विद्यार्थी कृषी पदविकाधारक बनले. जिल्ह्यात कृषी शिक्षणात मानाचा तुरा खोवणाºया कृषी महाविद्यालयाची सुरूवात २००८ मध्ये करण्यात आली. या महाविद्यालयात आतापर्यंत जवळपास ७०० विद्यार्थ्यांनी बीएससी अ‍ॅग्रीचे शिक्षण पूर्ण करून बहुसंख्येने आता आपल्या पायावर उभे आहेत.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळEducation Sectorशिक्षण क्षेत्रSocialसामाजिक