शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

कृषीसोबतच आता शिक्षणातही पाणलोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:25 IST

जालना येथे कार्यरत असलेल्या मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्यावतीने गेल्या दशकात जिल्ह्यातील बहुतांश गावात पाणलोटाची कामे करण्यात आल्याने ती गावे पाणीदार झाली आहे.

विष्णू वाकडे ।लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना येथे कार्यरत असलेल्या मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्यावतीने गेल्या दशकात जिल्ह्यातील बहुतांश गावात पाणलोटाची कामे करण्यात आल्याने ती गावे पाणीदार झाली आहे. या मंडळाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी ज्ञानगंगा गावोगावी पोहचवून जणू शिक्षणातही पाणलोट करून मुलांना बदलत्या प्रवाहात आणून सोडले आहे.मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या माध्यमातून कृषीरत्न विजयअण्णा बोराडे आणि त्यांचे सहकारी यांनी २००३ मध्ये कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली. महिन्याला शेतकऱ्यांना चर्चासत्राच्या माध्यमातून तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली शेती व्यवसायात शिक्षित करण्याचा सुरू केलेला प्रयत्न आजही कायम आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायात कृषी विज्ञान केंद्रामुळे चांगले परिवर्तन घडून आले. ब-याच शेतक-यांच्या यशोगाथा तयार झाल्या. ते कृषी विज्ञान केंद्रामुळे. पाणलोटमध्येही आसरखेडा असो की कडवंची ते शिवणीसह बहुतांश गावांनी वाहते पाणी थांबविले. यामुळे पाणलोटाची कामे झालेली गावे आजही भयावह दुष्काळावर मात करीत आहेत.कृषी विज्ञान केंद्रात हजारो महिला, युवक व युवतींना वेगवेगळे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्याचे स्वप्न पूर्ण केले गेले. रेशीम उद्योगपासून ते शेळीपालनापर्यंत शेतीपुरक व्यवसायाची सुरुवात मोठ्या प्रमाणात महिला तसेच पुरुषांनी केली आहे.हे काम करीत असताना मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या नजरेतून सद्य स्थितीतील शिक्षणातील स्पर्धा सुटली नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी येथे निवासी शाळा असावी असा विचार पुढे आल्यानंतर कृषीरत्न विजयअण्णा बोराडे तसेच कृषीभूषण भगवानराव काळे आणि येथील विश्वस्त यांनी आमची शाळा नावाची निवासी शाळा २००३ मध्ये खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात सुरू केली. २००८ मध्ये दहावीची पहिली बॅच १०० टक्के निकाल देऊन बाहेर पडली.मुलींनाही शिक्षण२०१२ च्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतक-यांच्या मुलींनाही येथे शिक्षण देण्यात आले. एवढेच नाही तर २००४ मध्ये कृषी तज्ञ विद्यालयाची स्थापना करण्यात आली. या विद्यालयातून जवळपास ५०० विद्यार्थी कृषी पदविकाधारक बनले. जिल्ह्यात कृषी शिक्षणात मानाचा तुरा खोवणाºया कृषी महाविद्यालयाची सुरूवात २००८ मध्ये करण्यात आली. या महाविद्यालयात आतापर्यंत जवळपास ७०० विद्यार्थ्यांनी बीएससी अ‍ॅग्रीचे शिक्षण पूर्ण करून बहुसंख्येने आता आपल्या पायावर उभे आहेत.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळEducation Sectorशिक्षण क्षेत्रSocialसामाजिक