शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

विमा नामंजूर झाल्याने रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:35 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी सकाळी १० ते ११ या वेळेत धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी आपल्या कापूस, सोयाबीन व तूर या पिकांना संरक्षण कवच म्हणून कोट्यवधी रुपयांचा पीकविमा भरणा केला होता. परंतु, कंपनीकडून अनेक महसूल मंडळातील खरीप पीकविमा नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी सकाळी १० ते ११ या वेळेत धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला.जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. वातावरणातील विविध घटकांचा पिकावर विपरीत परिणाम होऊन पिकांचे नुकसान होऊन आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून शेतकरी या पिकांना विमा संरक्षण म्हणून पीकविमा भरला जातो. पंतप्रधान पीक विमा योजनेचा खरीप हंगाम २०१९ चा आयसीआयसीआय. लोम्बार्ड या विमा कंपनीकडे लाखो शेतकऱ्यांनी विमा भरणा केला आहे.विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात अल्प प्रमाणात पेरणी होत असलेल्या बाजरी आणि मूग या पिकाचा विमा बहुतेक सर्व मंडळात मंजूर करण्यात आला आहे. विमा कंपनीने ज्या पिकांचा विमा भरणा जास्त आहे. तो वगळला व अल्प पेरा असलेल्या पिकांचा विमा मंजूर केल्याने विमा कंपनी मालामाल तर शेतकरी कंगाल केला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश काळे यांनी यावेळी बोलतांना केला.भयंकर दुष्काळी परिस्थिती असतांनाही आयसीआयसीआय. लोम्बार्ड या कंपनीने विमा नाकारल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे याविषयी प्रशासनाने वेळीच दखल घेऊन विमा मंजूर करावा, असे निवेदन कृषी अधिकारी तारगे यांना देण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश काळे, छावा संतोष जेधे, भाऊसाहेब कणके, बळीराम खटके, रईस बागवान यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गजानन बंगाळे, राजेंद्र डाके, राधाकिसन मैंद, अशोक जाधव, पांडुरंग गटकळ, रामचंद्र खोमणे, सहदेव भारती, रुस्तुम पठाण, विजय नाझरकर, भागूजी मैद आदींची उपस्थिती होती.पीकविमा : ३३ मंडळांत नाकारलाजिल्ह्यातील ४८ महसूल मंडळापैकी ३३ मंडळातील विमा दावा नाकारण्यात आला आहे. ज्या १५ महसूल मंडळात कापसाचा विमा मिळाला तो ही तुटपुंजा असून हेक्टरी बाराशे ते तेराशे रुपये विमा मंजूर करण्यात आला आहे. तर सोयाबीन या पिकाचा ४८ महसूल मंडळांपैकी फक्त ४ महसूल मंडळांत विमा मंजूर करण्यात आला आहे. तर उर्वरित ४४ मंडळांचा विमा नाकारण्यात आला. तसेच तुरीचा विमा ही अनेक मंडळात नामंजूर करण्यात आला आहे.पीक कापणी अहवाल हा महसूल, कृषी व पंचायत या तीन यंत्रणांच्या संयुक्त समिती मार्फत करण्यात येतो. कंपनीने पीक विमा नाकारल्याने आम्ही आमची आकडेवारी सुद्धा तपासून पाहू. याविषयी शासन स्तरावर व विमा कंपनीकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांनी आंदोलकांना यावेळी दिली. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा