शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

विमा नामंजूर झाल्याने रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:35 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी सकाळी १० ते ११ या वेळेत धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी आपल्या कापूस, सोयाबीन व तूर या पिकांना संरक्षण कवच म्हणून कोट्यवधी रुपयांचा पीकविमा भरणा केला होता. परंतु, कंपनीकडून अनेक महसूल मंडळातील खरीप पीकविमा नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी सकाळी १० ते ११ या वेळेत धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला.जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. वातावरणातील विविध घटकांचा पिकावर विपरीत परिणाम होऊन पिकांचे नुकसान होऊन आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून शेतकरी या पिकांना विमा संरक्षण म्हणून पीकविमा भरला जातो. पंतप्रधान पीक विमा योजनेचा खरीप हंगाम २०१९ चा आयसीआयसीआय. लोम्बार्ड या विमा कंपनीकडे लाखो शेतकऱ्यांनी विमा भरणा केला आहे.विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात अल्प प्रमाणात पेरणी होत असलेल्या बाजरी आणि मूग या पिकाचा विमा बहुतेक सर्व मंडळात मंजूर करण्यात आला आहे. विमा कंपनीने ज्या पिकांचा विमा भरणा जास्त आहे. तो वगळला व अल्प पेरा असलेल्या पिकांचा विमा मंजूर केल्याने विमा कंपनी मालामाल तर शेतकरी कंगाल केला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश काळे यांनी यावेळी बोलतांना केला.भयंकर दुष्काळी परिस्थिती असतांनाही आयसीआयसीआय. लोम्बार्ड या कंपनीने विमा नाकारल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे याविषयी प्रशासनाने वेळीच दखल घेऊन विमा मंजूर करावा, असे निवेदन कृषी अधिकारी तारगे यांना देण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश काळे, छावा संतोष जेधे, भाऊसाहेब कणके, बळीराम खटके, रईस बागवान यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गजानन बंगाळे, राजेंद्र डाके, राधाकिसन मैंद, अशोक जाधव, पांडुरंग गटकळ, रामचंद्र खोमणे, सहदेव भारती, रुस्तुम पठाण, विजय नाझरकर, भागूजी मैद आदींची उपस्थिती होती.पीकविमा : ३३ मंडळांत नाकारलाजिल्ह्यातील ४८ महसूल मंडळापैकी ३३ मंडळातील विमा दावा नाकारण्यात आला आहे. ज्या १५ महसूल मंडळात कापसाचा विमा मिळाला तो ही तुटपुंजा असून हेक्टरी बाराशे ते तेराशे रुपये विमा मंजूर करण्यात आला आहे. तर सोयाबीन या पिकाचा ४८ महसूल मंडळांपैकी फक्त ४ महसूल मंडळांत विमा मंजूर करण्यात आला आहे. तर उर्वरित ४४ मंडळांचा विमा नाकारण्यात आला. तसेच तुरीचा विमा ही अनेक मंडळात नामंजूर करण्यात आला आहे.पीक कापणी अहवाल हा महसूल, कृषी व पंचायत या तीन यंत्रणांच्या संयुक्त समिती मार्फत करण्यात येतो. कंपनीने पीक विमा नाकारल्याने आम्ही आमची आकडेवारी सुद्धा तपासून पाहू. याविषयी शासन स्तरावर व विमा कंपनीकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांनी आंदोलकांना यावेळी दिली. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा