शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कुठे शाळा, कुठे मंदिरातून गावचा कारभार; जालन्यात १७६ ग्रामपंचायतींना इमारतच नाही

By विजय मुंडे  | Updated: July 13, 2023 07:05 IST

मूलभूत सुविधा सोडा १७६ ग्रामपंचायतींनाच स्वत:ची इमारत नसल्याची दुर्दैवी बाब आहे.

जालना : एकीकडे डिजिटल इंडियाच्या माध्यमातून शहरी, ग्रामीण भागाचा विकास करण्याच्या घोषणा शासन करीत आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील १०-२० नव्हे तब्ब्ल १७६ ग्रामपंचायतींना स्वत:च्या इमारतीच नाहीत. परिणामी कुठे शाळेत बसून, कुठे मंदिरात बसून तर कुठे खासगी इमारतीचा वापर करीत गावाचा गाडा हाकण्याची वेळ गावकारभाऱ्यांवर आली आहे. विशेषतः पाठीवर दप्तर घेऊन ग्रामसेवकांना फिरावे लागत असून, गावाच्या विकासाला गती मिळणार कशी अन् डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण होणार कसे असाच प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे.

जिल्ह्यातील अनेक गावखेड्यात अद्याप मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. मूलभूत सुविधा सोडा १७६ ग्रामपंचायतींनाच स्वत:ची इमारत नसल्याची दुर्दैवी बाब आहे. कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, रस्ते, ग्रामोद्याेग, सहकाराच्या विविध योजना गावस्तरावर राबविण्यात ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची असते. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता यासह इतर बाबींवर ग्रामपंचायतीकडून कामकाज केले जाते. परंतु, ही कामे करण्यासाठी मासिक बैठका घ्याव्या लागतात. या बैठका घेण्यासाठी जागाच नसेल तर गाव कारभारी आणि अधिकाऱ्यांची मोठी पंचायत होते. अशीच स्थिती जिल्ह्यातील १७६ गावांची आहे. ग्रामपंचायतीला इमारत नसल्याने कुठे शाळेच्या खोलीत, कुठे मंदिरात तर कुठे अंगणवाड्यांच्या इमारतीत बसून गावाचा कारभार हाकण्याची वेळ अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर आली आहे. विशेषतः डिजिटल इंडियाचे स्वप्न शासन पाहत असले तरी या ग्रामपंचायतींत संगणकाचाही पत्ता नाही. महत्त्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी खोली किरायाणे घेण्याची वेळ अनेक ग्रामपंचायतींवर आली आहे. अशा स्थितीमुळे गावांच्या विकासाला ब्रेक लागला असून, याकडे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

सहा महिन्यांपूर्वीच प्रस्ताव दिलाग्रामपंचायतीची इमारत नसल्याने मासिक बैठका हनुमान मंदिरात होतात. इमारतीअभावी कामकाजात अडचणी येत असून, इमारत उपलब्ध व्हावी, यासाठी सहा महिन्यांपूर्वीच प्रस्ताव दिला आहे.- अर्चना झाेल, सरपंच, रामतीर्थ, ता. मंठा

कामात अडचणी येतातग्रामपंचायत इमारतीचे काम २०२१ पासून रखडले आहे. त्यामुळे मासिक बैठका शाळेच्या खोलीत घ्याव्या लागतात. कामात अडचणी येतात. ग्रामपंचायत इमारतीचे रखडलेले काम पूर्ण व्हावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- विमल आठवे, सरपंच, मापेगाव (बु.)

सुसज्ज इमारतीची मागणीग्रामपंचायतीची एकच खोली आहे. त्यात संगणक रूम, बैठक हॉल, पदाधिकाऱ्यांच्या बसण्याची व्यवस्था आहे. अपुऱ्या जागेमुळे कामात अडथळे निर्माण होत असून, सुसज्ज इमारतीची मागणी केली आहे.संगीता राठोड, सरपंच, येवला

इमारत नसलेल्या ग्रामपंचायतीतालुका ग्रामपंचायतीजालना- २४बदनापूर- १५अंबड- २१घनसावंगी- ३२परतूर- १६मंठा- २८भोकरदन- २७जाफराबाद- १३

टॅग्स :Jalanaजालनाgram panchayatग्राम पंचायत