शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
5
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
6
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
7
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
8
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
9
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
10
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
11
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
12
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
13
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
14
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
15
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
16
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
17
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
18
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
19
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
20
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

९७ विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:24 IST

उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाने ३६ गावांसाठी ९७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाने ३६ गावांसाठी ९७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये भोकरदन तालुक्यातील सर्वाधिक १९ गावांचा समावेश आहे.या वर्षी एप्रिल महिन्यात तापमान ४० अंशावर गेले आहे. त्यामुळे विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत असून, जलस्रोत कोरडे पडत आहे. परिणामी पाणीपुरवठ्याची कायमस्वरुपी व्यवस्था नसलेल्या गावांमध्ये टंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. भोकरदन तालुक्यातील १९, जाफराबादमधील १५ आणि परतूर आणि जालना तालुक्यातील प्रत्येकी एका गावात टंचाई पाणी टंचाई जानवत असल्याने टँकर सुरू करण्याबरोबर विहीर अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा प्रशासनाकडे पाठवला होता.त्यानुसार भोकरदन तालुक्यातील १९ गावांसाठी २६, जाफराबाद तालुक्यातील १६ आणि परतूर तालुक्यात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. शुक्रवारपर्यंत टँकरच्या दीडश खेपा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.पाणीपुरवठा योजना रखडल्या: मे मध्ये वाढणार टँकरची संख्याजिल्ह्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय पेयजल व मुख्यमंत्री पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहेत. मात्र, बहुतांश योजनांची कामे अपूर्ण असल्याने पाणीप्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देणे महत्त्वाचे ठरणार आहे.जिल्ह्यात आठवडाभरापासून तापमानामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीपातळी कमी होत आहे. मे महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढल्यास पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांमधी संख्या वाढण्याची शक्यता आहे. परिणामी टँकरची संख्याही वाढणार असून, प्रशासनाला त्यासाठी नियोजन करावे लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईzpजिल्हा परिषद