शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

९७ विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:24 IST

उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाने ३६ गावांसाठी ९७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाने ३६ गावांसाठी ९७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये भोकरदन तालुक्यातील सर्वाधिक १९ गावांचा समावेश आहे.या वर्षी एप्रिल महिन्यात तापमान ४० अंशावर गेले आहे. त्यामुळे विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत असून, जलस्रोत कोरडे पडत आहे. परिणामी पाणीपुरवठ्याची कायमस्वरुपी व्यवस्था नसलेल्या गावांमध्ये टंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. भोकरदन तालुक्यातील १९, जाफराबादमधील १५ आणि परतूर आणि जालना तालुक्यातील प्रत्येकी एका गावात टंचाई पाणी टंचाई जानवत असल्याने टँकर सुरू करण्याबरोबर विहीर अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा प्रशासनाकडे पाठवला होता.त्यानुसार भोकरदन तालुक्यातील १९ गावांसाठी २६, जाफराबाद तालुक्यातील १६ आणि परतूर तालुक्यात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. शुक्रवारपर्यंत टँकरच्या दीडश खेपा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.पाणीपुरवठा योजना रखडल्या: मे मध्ये वाढणार टँकरची संख्याजिल्ह्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय पेयजल व मुख्यमंत्री पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहेत. मात्र, बहुतांश योजनांची कामे अपूर्ण असल्याने पाणीप्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देणे महत्त्वाचे ठरणार आहे.जिल्ह्यात आठवडाभरापासून तापमानामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीपातळी कमी होत आहे. मे महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढल्यास पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांमधी संख्या वाढण्याची शक्यता आहे. परिणामी टँकरची संख्याही वाढणार असून, प्रशासनाला त्यासाठी नियोजन करावे लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईzpजिल्हा परिषद