शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

९७ विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:24 IST

उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाने ३६ गावांसाठी ९७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाने ३६ गावांसाठी ९७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये भोकरदन तालुक्यातील सर्वाधिक १९ गावांचा समावेश आहे.या वर्षी एप्रिल महिन्यात तापमान ४० अंशावर गेले आहे. त्यामुळे विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत असून, जलस्रोत कोरडे पडत आहे. परिणामी पाणीपुरवठ्याची कायमस्वरुपी व्यवस्था नसलेल्या गावांमध्ये टंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. भोकरदन तालुक्यातील १९, जाफराबादमधील १५ आणि परतूर आणि जालना तालुक्यातील प्रत्येकी एका गावात टंचाई पाणी टंचाई जानवत असल्याने टँकर सुरू करण्याबरोबर विहीर अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा प्रशासनाकडे पाठवला होता.त्यानुसार भोकरदन तालुक्यातील १९ गावांसाठी २६, जाफराबाद तालुक्यातील १६ आणि परतूर तालुक्यात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. शुक्रवारपर्यंत टँकरच्या दीडश खेपा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.पाणीपुरवठा योजना रखडल्या: मे मध्ये वाढणार टँकरची संख्याजिल्ह्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय पेयजल व मुख्यमंत्री पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहेत. मात्र, बहुतांश योजनांची कामे अपूर्ण असल्याने पाणीप्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देणे महत्त्वाचे ठरणार आहे.जिल्ह्यात आठवडाभरापासून तापमानामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीपातळी कमी होत आहे. मे महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढल्यास पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांमधी संख्या वाढण्याची शक्यता आहे. परिणामी टँकरची संख्याही वाढणार असून, प्रशासनाला त्यासाठी नियोजन करावे लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईzpजिल्हा परिषद