शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

९७ विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:24 IST

उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाने ३६ गावांसाठी ९७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाने ३६ गावांसाठी ९७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये भोकरदन तालुक्यातील सर्वाधिक १९ गावांचा समावेश आहे.या वर्षी एप्रिल महिन्यात तापमान ४० अंशावर गेले आहे. त्यामुळे विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत असून, जलस्रोत कोरडे पडत आहे. परिणामी पाणीपुरवठ्याची कायमस्वरुपी व्यवस्था नसलेल्या गावांमध्ये टंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. भोकरदन तालुक्यातील १९, जाफराबादमधील १५ आणि परतूर आणि जालना तालुक्यातील प्रत्येकी एका गावात टंचाई पाणी टंचाई जानवत असल्याने टँकर सुरू करण्याबरोबर विहीर अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा प्रशासनाकडे पाठवला होता.त्यानुसार भोकरदन तालुक्यातील १९ गावांसाठी २६, जाफराबाद तालुक्यातील १६ आणि परतूर तालुक्यात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. शुक्रवारपर्यंत टँकरच्या दीडश खेपा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.पाणीपुरवठा योजना रखडल्या: मे मध्ये वाढणार टँकरची संख्याजिल्ह्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय पेयजल व मुख्यमंत्री पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहेत. मात्र, बहुतांश योजनांची कामे अपूर्ण असल्याने पाणीप्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देणे महत्त्वाचे ठरणार आहे.जिल्ह्यात आठवडाभरापासून तापमानामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीपातळी कमी होत आहे. मे महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढल्यास पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांमधी संख्या वाढण्याची शक्यता आहे. परिणामी टँकरची संख्याही वाढणार असून, प्रशासनाला त्यासाठी नियोजन करावे लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईzpजिल्हा परिषद