शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

वर्षभरात एक दिवसाआड एकाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 01:00 IST

वर्षभरात जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर तब्बल १६५ अपघात झाले असून यामध्ये १७१ लोकांना प्राण गमवावे लागले आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वर्षभरात जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर तब्बल १६५ अपघात झाले असून यामध्ये १७१ लोकांना प्राण गमवावे लागले आहे. सरासरीनुसार जिल्ह्यात दोन दिवसाला दोन अपघात, तर दोन दिवसाला एक व्यक्ती ठार होत असल्याचे दिसून येते. खराब रस्ते, नियमांचे पालन न करणे, मद्यपान, निष्काळजीपणा, अति घाई हे मुद्दे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. वर्षभरात एक दिवसाआड एकाचा मृत्यू होत आहे.जालना जिल्ह्यात दिवसेंदिवस महामार्गावरील अपघातांची संख्या वाढत चालली आहे. विस्कळीत वाहतूक व्यवस्था, नियमांचे पालन न करणे यासारखी कारणे अपघातास निमंत्रण देत आहेत. जिल्ह्यातून पाच राज्य महामार्ग जातात. यामध्ये औरंगाबाद- जालना, जालना -नांदेड, जालना - देऊळगावराजा, जालना-सिंदखेड राजा, जालना - अंबड यांचा समावेश आहे. यातील जालना-अंबड महामार्ग खुपच अरूंद आहे. त्यातच या मार्गावरून ट्रकसारख्या मोठ्या वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावर कोंडीसह अपघात जास्त होतात. याच मार्गावर जास्त अपघाताची नोंद असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. जिल्हा पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून वेळोवेळी रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते.या माध्यमातून नियमांचे पालनासंदर्भात आवाहन केले जाते. तसेच मार्गदर्शनही केले जाते. परंतु प्रशासनाकडूनही कागदोपत्रीच घोडे नाचविले जात असल्याने वाहनधारकांपर्यंत जनजागृती ख-या अर्थाने पोहचत नाही. याचा परिणामही अपघातांवर होत आहे. ‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’, ‘नियम पाळा, अपघात टाळा’, यासारखे फलक सर्वत्र दिसतात.अंबड रोडवर सर्वाधिक अपघातगेल्या अनेक वर्षांपासून चौपदरीकरण न झाल्यामुळे अंबड रस्त्यावर दररोज छोटे मोठे अपघात होतात. रस्त्यावरुन दररोज हजारो वाहने धावतात. त्यातच दुहेरी वाहतूक होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात वाढले आहे. या अपघातात अनेकांना आपले प्राणही गमावावे लागले आहे. काही महिन्यापूर्वीच या रस्त्याच्या चौपदरी करणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू