शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

जांबसमर्थ येथील ऐतिहासिक मूर्तींचा शोध लागेना; माहिती देणाऱ्यास २ लाखांचे बक्षीस जाहीर

By दिपक ढोले  | Updated: October 13, 2022 16:33 IST

२२ ऑगस्ट रोजी घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यातून राम, लक्ष्मण, सीता, हनुमान या देवांच्या पंचधातूच्या मूर्तीं चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या.

जालना : घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील मंदिरातून पंचधातूच्या चार मूर्ती चोरी जाऊन जवळपास दीड महिन्यांचा कालावधी होत आहे. मात्र, अद्यापही पोलिसांना मूर्तींचा शोध लागला नाही. शेवटी मूर्तींची माहिती देणाऱ्यास जिल्हा पोलीस दलाने २ लाखांचे बक्षीस जाहीर केले असून, मूर्तींसंदर्भात कुठलीही माहिती नागरिकांना असल्यास त्यांनी तत्काळ द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

२२ ऑगस्ट रोजी घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यातून राम, लक्ष्मण, सीता, हनुमान या देवांच्या पंचधातूच्या मूर्तीं चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी पुजारी धनंजय वसंतराव देशपांडे यांच्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर पोलिसांनी या घटनेचा तपास केला. अनेक गुन्हेगारांची चौकशी केली. शिवाय, गावासह परिसरातही तपासणी केली. परंतु, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. पोलिसांनी मुंबईसह देशभरात मूर्तींचा शोध घेतला. परंतु, काहीच हाती लागले नाही. या घटनेला जवळपास दीड महिन्यांचा कालावधी झाला आहे. मूर्तींचा शोध घेण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांसह राज्यकीय नेत्यांनी आंदोलन केले आहे. दरम्यान, मूर्तींचा शोध लागत नसल्याने जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. मूर्तींची माहिती देणाऱ्यास जवळपास २ लाख रूपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यांच्याशी करा संपर्कनागरिकांना मूर्तींची माहिती मिळाल्यास त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, सपोनि. योगेश धाेंडे, पोउपनि. प्रमोद बोंडले यांच्यासह नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाचशे वर्ष जुन्या आहेत मूर्ती  तीर्थक्षेत्र जांबसमर्थ हे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे. येथील जांबसमर्थ मंदिर, श्रीराम मंदिरात इ.स. १५३५ मधील श्री राम, सितामाता, लक्ष्मण व हनुमान यांच्या पंचधातूच्या सहा मूर्ती होत्या. विशेषत: श्री समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागत असताना भिक्षापात्रात ठेवली जाणारी व हाताच्या दंडावर बांधली जाणारी हनुमानाची मूर्तीही या मंदिरात होती. चोरट्यांनी २२ ऑगस्ट रोजी पाहटे श्रीराम मंदिरातून श्रीराम, सितामाता, लक्ष्मण, हनुमानांच्या दोन मूर्तींसह सहा पंचधातूंच्या मूर्तींची चोरी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना