शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

८६ तलावांचा ‘पाझर’ थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:26 IST

जिल्ह्यातील ८६ पाझर तलावांची अवस्था बिकट झाली असून, दुरूस्तीअभावी पावसाचे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने जलसंधारणाची अनेक कामे हाती घेतली आहेत. मात्र, जिल्ह्यातील ८६ पाझर तलावांची अवस्था बिकट झाली असून, दुरूस्तीअभावी पावसाचे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या तलावांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला ७ कोटी ९८ लाखांचा निधी उपलब्ध होत नाही. परिणामी जिल्ह्यातील ८६ तलावांना फुटलेला ‘पाझर’ आजही कायम असून, पावसाचा थेंब-थेंब अडविण्याचे शासनाचे स्वप्न कागदावरच राहत आहे.दुष्काळ जिल्ह्याच्या पाचवीला पुजला असून, टंचाई निवारणार्थ शेकडो टँकर, तात्पुरत्या नळ योजनांसह इतर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. घागरभर पाण्यासाठी ग्रामीण भागातील महिला, मुलांसह वयोवृध्दांनाही शेतशिवारात भटकंती करावी लागते. दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अनेक कामेही केली जात आहेत. मात्र, जिल्ह्यातील पाझर तलाव, लघू-मध्यम प्रकल्पांच्या दुरूस्तीकडे मात्र, फासरे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे.ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाणी, शेतातील जलस्त्रोतांच्या पाणीपातळीत वाढ व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुपाट बंधारे विभागांतर्गत जिल्ह्यात ५१२ पाझर तलाव बांधण्यात आले आहेत. या तलावाची साठवण क्षमता १ लाख ६१ हजार २४९ द. ल. घ. मी आहे. तर सिंचन क्षमता १३ हजार ४७३ हेक्टर आहे. या तलावांमुळेच जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्न मिटू शकतो. परंतु, यातील काही तलावांची दुरुस्ती न झाल्यामुळे या तलावांमध्ये पाणीच राहत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यातील ८६ पाझर तलाव नादुरुस्त आहेत. जालना तालुक्यातील १५, बदनापूर १०, अंबड ८, घनसावंगी ५, परतूर ७, मंठा १५, भोकरदन १८, जाफराबाद तालुक्यातील ८ तलाव नादुरुस्त आहे. यांच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी रुपयांची गरज आहे. यात जालना तालुक्यातील तलावासाठी १ कोटी ५५ लाख, बदनापूर तालुक्यातील तलावासाठी ८० लाख, अंबड तालुक्यातील तलावासाठी ७० लाख, घनसावंगी तालुक्यातील तलावासाठी ४८ लाख, परतूर तालुक्यातील तलावासाठी ५० लाख, मंठा तालुक्यातील तलावासाठी १ कोटी ५० लाख, भोकरदन तालुक्यातील तलावासाठी १ कोटी ७० लाख, जाफराबाद तालुक्यातील ७५ लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. मात्र, निधी उपलब्ध होत नसल्याने या पाझर तलावांची दुरूस्ती होत नाही. परिणामी प्रत्येक वर्षी पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जात आहे. पाझर तलावासह इतर प्रकल्पांच्या दुरूस्तीबाबत अशीच परिस्थिती राहिली तर दुष्काळावर मात होणार कशी ? असाच प्रश्न शेतकरी, सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. दरम्यान, याबाबत लघु पाट बंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.साडेतीन कोटींचा खर्च : मागील वर्षी ४७ पाझर तलावांची दुरुस्तीजलयुक्त शिवार योजनेतंर्गत सन २०१८-१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने ४७ पाझर तलावांची दुरुस्ती करण्यात आली असल्याची माहिती लघु पाट बंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. यात जालना तालुक्यातील ६, बदनापूर ७, परतूर २, मंठा १२, भोकरदन १३, जाफराबाद तालुक्यातील ७ तलावांची दुरुस्ती करण्यात आली आहे. यासाठी ३ कोटी ६० लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी