शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

रोहयो कामांवर ८ हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 1:02 AM

जालना : जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामांना आता मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. आज घडीला ४५५ कामांवर जवळपास आठ हजार ३२४ मजुरांची उपस्थिती असल्याचे सांगण्यात आले.ही कामे करताना कुशल आणि अकुशल अशी विभागनी करण्यात आली आहे. अकुशल कामांची संख्या ही १०८ असून, कुशल कामे सध्या सुरू झाले नसल्याचे सांगण्यात आले. सध्या ...

जालना : जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामांना आता मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. आज घडीला ४५५ कामांवर जवळपास आठ हजार ३२४ मजुरांची उपस्थिती असल्याचे सांगण्यात आले.ही कामे करताना कुशल आणि अकुशल अशी विभागनी करण्यात आली आहे. अकुशल कामांची संख्या ही १०८ असून, कुशल कामे सध्या सुरू झाले नसल्याचे सांगण्यात आले. सध्या शेतीमध्ये देखील हवी तेवढी कामे उपलब्ध नसल्याने अनेकांच्या हाताला कामाची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन रोजगार हमी विभागाने स्वंतत्र आराखडा तयार केला आहे.यात जिल्ह्यातील ७७९ ग्रामपंचायतींपैकी केवळ १६३ ग्रामपंचपायतीतच ही कामे सुरू आहेत. यात तालुकानिहाय कामे आणि मजुरांची उपस्थिती अशी आहे. अंबड १२७ - (१७२७), बदनापूर ३४ - (५२६), भोकरदन ६९ - (१४९५), घनसावंगी ५६- (९९१), जाफराबाद २१-(२२९७), जालना ७९- (७३२), मंठा २२ - (१०९), आणि परतूर ४७ - (४७७) अशी आहे. कंसा बाहेरील आकडे त्या तालुक्यात सुरू असलेली कामे दर्शवितात तर कंसातील आकडे हे त्या कामांवर असलेल्या मजुरांची संख्या आहे.कडक उन्हातही कामसध्या जालना जिल्ह्यात उन्हाचा पारा हा ४० ते ४१ अंशावर पोहोचलेला आहे. असे असतानाही रोजगार हमी योजनेवरील मजूर हे पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हाची तमा बाळगत नसल्याचे दिसून आले. मजुरांना कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.प्रशासन : मजुरांची संख्या वाढल्यास नियोजन तयाररोजगार हमी योजनेच्या कामावर जिल्ह्यात आठ हजार मजूर सध्या कार्यरत आहेत. परंंतु भविष्यात आणखी मागणी वाढल्यास रोजगार हमी विभागाने त्याची पूर्ण तयारी केली आहे. कुशल तसेच अकुशल कामांचे नियोजन हे त्या ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार ठरणार असल्याचे उपजिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाJalanaजालना