शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

‘स्वाधार’साठी ६४८ जणांनी केले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:21 IST

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ६४८ विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ६४८ विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज केले आहेत. तर १३८ जणांनी ‘रिनवेल’ अर्ज केले आहेत. तर कागदपत्रांची तातडीने पूर्तता केलेल्या १५६ जणांना या योजनेचा लाभ अद्याप मिळाला असून दोन- चार दिवसात ४६ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे.शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र परंतु, प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना वर्षभराचा शैक्षणीक खर्च भागविता येतो.या योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागातर्फे आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून अर्ज स्वीकारणे सुरू करण्यात आले आहे.अद्यापही अर्ज घेतले जात असून आतापर्यंत जिल्ह्यातील ६४८ विद्यार्थ्यांनी नव्याने तर १३८ जणांनी रिनवेल अर्ज केले आहेत. यातील १५६ विद्यार्थ्यांना या योजनेचा आतापर्यंत लाभ मिळाला आहे. तर ४६ जणांच्या बँक खात्यावर दोन- चार दिवसात रक्कम जमा होणार आहे. चालू वर्षातील विद्यार्थ्यांना या योजनेचा तातडीने लाभ देण्यात येत आहे. मात्र, मागील वर्षीचे ४० विद्यार्थ्यांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळालेला नाही.हेच ठरणार लाभार्थीविद्यार्थ्यांना किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक कोर्स पूर्ण करताना विद्यार्थ्याला एकदाच एटीकेटी असलेले विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रgovernment schemeसरकारी योजनाSC STअनुसूचित जाती जमाती