शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

‘स्वाधार’साठी ६४८ जणांनी केले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:21 IST

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ६४८ विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ६४८ विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज केले आहेत. तर १३८ जणांनी ‘रिनवेल’ अर्ज केले आहेत. तर कागदपत्रांची तातडीने पूर्तता केलेल्या १५६ जणांना या योजनेचा लाभ अद्याप मिळाला असून दोन- चार दिवसात ४६ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे.शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र परंतु, प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना वर्षभराचा शैक्षणीक खर्च भागविता येतो.या योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागातर्फे आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून अर्ज स्वीकारणे सुरू करण्यात आले आहे.अद्यापही अर्ज घेतले जात असून आतापर्यंत जिल्ह्यातील ६४८ विद्यार्थ्यांनी नव्याने तर १३८ जणांनी रिनवेल अर्ज केले आहेत. यातील १५६ विद्यार्थ्यांना या योजनेचा आतापर्यंत लाभ मिळाला आहे. तर ४६ जणांच्या बँक खात्यावर दोन- चार दिवसात रक्कम जमा होणार आहे. चालू वर्षातील विद्यार्थ्यांना या योजनेचा तातडीने लाभ देण्यात येत आहे. मात्र, मागील वर्षीचे ४० विद्यार्थ्यांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळालेला नाही.हेच ठरणार लाभार्थीविद्यार्थ्यांना किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक कोर्स पूर्ण करताना विद्यार्थ्याला एकदाच एटीकेटी असलेले विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रgovernment schemeसरकारी योजनाSC STअनुसूचित जाती जमाती